शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निर्णयामुळे काजू शेतकऱ्यांना दिलासा, अमित आवटे यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:14 IST

राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्णयामुळे काजू शेतकऱ्यांना दिलासा, अमित आवटे यांची प्रतिक्रिया काजू प्रक्रिया उद्योगासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद

कणकवली : राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेली काही वर्षे आजारी अवस्थेकडे जाणारा काजू प्रक्रिया उद्योग हा विविध कारणांनी ग्रासलेला होता. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात काजूची झालेली घसरण हे त्याचे मुख्य कारण होते. मागीलवर्षीच झालेली काजू पीक विकास परिषदेची स्थापना ही अर्थमंत्र्यांच्या सूचनेने झाली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल काजू व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे काजू पीक विकास परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी १५ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेत ओरोस येथे काजू प्रक्रिया उद्योग कारखानदार आणि शेतकरी यांची पहिली संयुक्त बैठक घेऊन या व्यवसायाच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न सुरू केला होता. तसेच कृषी विद्यापीठ दापोली येथे जाऊन तज्ज्ञ मंडळींशी सल्लामसलत केली होती.प्रत्यक्षरित्या खेड्यापाड्यातील सत्तर ते ऐंशी हजार महिलांना रोजगार मिळवून देणारा हा उद्योग अप्रत्यक्षात सुमारे २,००,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे हा उद्योग वाचवण्यासाठी भरीव तरतुदींची अत्यावश्यकता होती. हे अतुल काळसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवेदनशीलपणे जाणून अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही उपाययोजना सुचविल्या होत्या.

त्यामध्ये प्रामुख्याने जीएसटी परतावा सुरू करणे, व्हॅट परताव्यातील थकीत रक्कम परत मिळावी, बँकांकडून व्याजाची सवलत, कर्जाची पुनर्रचना, वस्त्रोद्योग धोरणाप्रमाणे काजू उद्योगासाठी योजना, सवलतीच्या दरात वीज पुरवठा, काजू बोंडूवर प्रक्रिया करून इथेनॉल किंवा सिएनजी निर्मितीसाठी पथदर्शी प्रकल्प, कोकणासाठी काजूचा ब्रँड विकसित करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या काळसेकर यांनी सातत्याने केल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे, असेही आवटे यांनी म्हटले आहे.मंत्री, नेत्यांचे आभारया निर्णयाबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, भाजपा नेते अतुल काळसेकर यांचे आम्ही आभार मानतो, असेही अमित आवटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग