शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शासनाच्या निर्णयामुळे काजू शेतकऱ्यांना दिलासा, अमित आवटे यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:14 IST

राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्णयामुळे काजू शेतकऱ्यांना दिलासा, अमित आवटे यांची प्रतिक्रिया काजू प्रक्रिया उद्योगासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद

कणकवली : राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेली काही वर्षे आजारी अवस्थेकडे जाणारा काजू प्रक्रिया उद्योग हा विविध कारणांनी ग्रासलेला होता. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात काजूची झालेली घसरण हे त्याचे मुख्य कारण होते. मागीलवर्षीच झालेली काजू पीक विकास परिषदेची स्थापना ही अर्थमंत्र्यांच्या सूचनेने झाली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल काजू व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे काजू पीक विकास परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी १५ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेत ओरोस येथे काजू प्रक्रिया उद्योग कारखानदार आणि शेतकरी यांची पहिली संयुक्त बैठक घेऊन या व्यवसायाच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न सुरू केला होता. तसेच कृषी विद्यापीठ दापोली येथे जाऊन तज्ज्ञ मंडळींशी सल्लामसलत केली होती.प्रत्यक्षरित्या खेड्यापाड्यातील सत्तर ते ऐंशी हजार महिलांना रोजगार मिळवून देणारा हा उद्योग अप्रत्यक्षात सुमारे २,००,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे हा उद्योग वाचवण्यासाठी भरीव तरतुदींची अत्यावश्यकता होती. हे अतुल काळसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवेदनशीलपणे जाणून अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही उपाययोजना सुचविल्या होत्या.

त्यामध्ये प्रामुख्याने जीएसटी परतावा सुरू करणे, व्हॅट परताव्यातील थकीत रक्कम परत मिळावी, बँकांकडून व्याजाची सवलत, कर्जाची पुनर्रचना, वस्त्रोद्योग धोरणाप्रमाणे काजू उद्योगासाठी योजना, सवलतीच्या दरात वीज पुरवठा, काजू बोंडूवर प्रक्रिया करून इथेनॉल किंवा सिएनजी निर्मितीसाठी पथदर्शी प्रकल्प, कोकणासाठी काजूचा ब्रँड विकसित करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या काळसेकर यांनी सातत्याने केल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे, असेही आवटे यांनी म्हटले आहे.मंत्री, नेत्यांचे आभारया निर्णयाबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, भाजपा नेते अतुल काळसेकर यांचे आम्ही आभार मानतो, असेही अमित आवटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग