शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साकाविरहित आंब्याचे स्वप्न साकार

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

चाचणी यशस्वी : निर्यातीमधील आणखी एक अडथळा दूर

रत्नागिरी : हापूस आंब्यातील साका ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा-काजू मंडळातर्फे घेण्यात आलेली अर्का साका निवारक प्रक्षेत्र चाचणी यशस्वी झाली आहे. फळे काढणीपूर्व फ्रूट डिपरचा वापर करून औषधामध्ये देठासह बुडवून ठेवली, तर साका होत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी योजनेतून आंबा-काजू मंडळातर्फे शेतकऱ्यांना औषध व फ्रूट डिपर सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आंबा हे भारतातील नगदी पीक असून, राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. मात्र आंब्यातील साका (साकळलेला पांढरा भाग) या दोषामुळे आंबा निर्यातीला मर्यादा येतात. निर्यातीत हा आंबा नाकारला जातो. या समस्येबाबत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हार्टिकल्चर रिसर्च, बंगलोर या संस्थेने संशोधन करून आंब्यातील साका समस्येचे निवारण केले आहे. याबाबत डॉ. रवींद्र यांनी २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने आंबा बागायतदारांच्या शेतावर प्रयोग यशस्वी केला आहे.साका नियंत्रणाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचण्याच्या दृष्टीने व निर्यातक्षम उत्पादनाची खात्री मिळण्याच्या दृष्टीने प्रयोगाच्या प्रक्षेत्र चाचण्यांची नितांत आवश्यकता असल्याने अर्का साका निवारकांच्या प्रक्षेत्र चाचण्या घेण्याबाबत प्रस्ताव महाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सादर केला होता.आंब्यामध्ये साका होऊ नये यासाठी आंब्यामध्ये बाठ तयार झाल्यानंतर व काढणीपूर्व १५ दिवस आधी आंबा फळे आय.आय.एच.आर. बंगलोर यांनी विकसित केलेल्या औषधामध्ये देठासह बुडवावी लागतात. त्यासाठी फ्रूट डिपरचा वापर केला जातो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निवड केलेल्या आंबा उत्पादकांना औषध व फ्रूट डिपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंबा काजू मंडळ, कृषी विभाग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना प्रशिक्षणजिल्हा कृषी अधीक्षक व कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० बागायतदारांची निवड केली आहे. यांना दि. २४ व २५ मार्चला वेंगुर्ला येथील कार्यशाळेत आय. आय. एच. आर. बंगलोरचे संशोधक डॉ. रवींद्र हे प्रात्यक्षिकाबाबत माहिती देणार आहेत.