शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साकाविरहित आंब्याचे स्वप्न साकार

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

चाचणी यशस्वी : निर्यातीमधील आणखी एक अडथळा दूर

रत्नागिरी : हापूस आंब्यातील साका ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा-काजू मंडळातर्फे घेण्यात आलेली अर्का साका निवारक प्रक्षेत्र चाचणी यशस्वी झाली आहे. फळे काढणीपूर्व फ्रूट डिपरचा वापर करून औषधामध्ये देठासह बुडवून ठेवली, तर साका होत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी योजनेतून आंबा-काजू मंडळातर्फे शेतकऱ्यांना औषध व फ्रूट डिपर सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आंबा हे भारतातील नगदी पीक असून, राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. मात्र आंब्यातील साका (साकळलेला पांढरा भाग) या दोषामुळे आंबा निर्यातीला मर्यादा येतात. निर्यातीत हा आंबा नाकारला जातो. या समस्येबाबत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हार्टिकल्चर रिसर्च, बंगलोर या संस्थेने संशोधन करून आंब्यातील साका समस्येचे निवारण केले आहे. याबाबत डॉ. रवींद्र यांनी २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने आंबा बागायतदारांच्या शेतावर प्रयोग यशस्वी केला आहे.साका नियंत्रणाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचण्याच्या दृष्टीने व निर्यातक्षम उत्पादनाची खात्री मिळण्याच्या दृष्टीने प्रयोगाच्या प्रक्षेत्र चाचण्यांची नितांत आवश्यकता असल्याने अर्का साका निवारकांच्या प्रक्षेत्र चाचण्या घेण्याबाबत प्रस्ताव महाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सादर केला होता.आंब्यामध्ये साका होऊ नये यासाठी आंब्यामध्ये बाठ तयार झाल्यानंतर व काढणीपूर्व १५ दिवस आधी आंबा फळे आय.आय.एच.आर. बंगलोर यांनी विकसित केलेल्या औषधामध्ये देठासह बुडवावी लागतात. त्यासाठी फ्रूट डिपरचा वापर केला जातो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निवड केलेल्या आंबा उत्पादकांना औषध व फ्रूट डिपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंबा काजू मंडळ, कृषी विभाग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना प्रशिक्षणजिल्हा कृषी अधीक्षक व कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० बागायतदारांची निवड केली आहे. यांना दि. २४ व २५ मार्चला वेंगुर्ला येथील कार्यशाळेत आय. आय. एच. आर. बंगलोरचे संशोधक डॉ. रवींद्र हे प्रात्यक्षिकाबाबत माहिती देणार आहेत.