शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ : नीतेश राणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:26 IST

कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.

ठळक मुद्देसमस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ  : नीतेश राणे यांचा इशारा लोकांच्या मागणीप्रमाणेच कणकवलीत काम झाले पाहिजे

कणकवली : कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर रवी कुमार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, स्वाभिमानचे शहराध्यक्ष राकेश राणे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, सचिन म्हाडगुत, अनिल शेटये, शिशिर परूळेकर, सोमनाथ गायकवाड, रामदास मांजरेकर, संदीप नलावडे, अभय राणे, किशोर राणे, आनंद राणे यांच्यासह प्रकल्पबाधित व शहरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, पावसाळ्यात तुम्हांला कणकवलीला बुडवायचे आहे का? आम्ही जमिनी दिल्या, त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणेच काम झाले पाहिजे़. कणकवलीत चौपदरीकरणाचे काम तुम्ही करता ना? मग वाहतूक कोंडी, तुंबलेली गटारे, धुळीच्या प्रादुर्भावावर कोण काम करणार? केलेल्या कामावर कोण पाणी मारणार? सर्व्हिस रोड केव्हा पूर्ण करणार? तुटलेली पाईपलाईन केव्हा सुरळीत करणार? पथदीप बंद केले ते कधी चालू करणार? या सगळ्या प्रश्नांवर तुम्हीच काम केले पाहिजे़ नुसती बोलबच्चनगिरी आता बंद करा. गोड बोलून आम्ही फसणार नाही, अशा शब्दांत प्रकाश शेडेकर यांच्यावर नीतेश राणे यांनी आगपाखड केली. जनतेच्या अडचणी न सोडविल्यास कणकवलीचा आमदार म्हणून मी गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, कणकवलीत नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे काम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने इमारती तोडू नयेत. अधिकारी काय कणकवलीचे जावई नाहीत. माझ्याकडे यापुढे कोणत्याही तक्रारी येता नयेत. एक जरी तक्रार आली तरी गप्प बसणार नाही, अशा सूचनाही राणे यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीचे ठेकेदार रवी कुमार आणि प्रकाश शेडेकर यांना दिल्या.यावेळी संतप्त झालेल्या आमदार राणे यांनी काही वेळातच या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका मांडत पुढील कार्यक्रमासाठी जाणे पसंत केले. त्यानंतर प्रकाश शेडेकर यांनी कणकवलीतील धुळीचा प्रादुर्भाव, सर्व्हिस रस्ते, स्ट्रीटलाईट तसेच धुळीवर पाणी मारण्याचे काम केले जाईल. तसेच गांगोमंदिर येथील अंडरपास जागेच्या ठिकाणी काम करणार नसल्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे यांच्यासह शहरातील नागरिकांनीही विविध प्रश्नांवर शेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले....तर महामार्गाचे काम बंद पाडणार!शहरातील गांगो मंदिर येथे अंडरपास व्हायलाच हवा. हे काम न झाल्यास डीपी रस्त्यापुढील उड्डाणपुलाचा एकही पिलर उभा करू दिला जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी महामार्ग दुतर्फा सर्व गटार बांधकामे आणि सांडपाणी निचरा व्यवस्था व्हायला हवी. याबाबत दिरंगाई झाली तर महामार्गाचे काम रोखू.

शहरात दिवसातून तीन वेळा रस्त्यावर पाणी मारणे अत्यावश्यक आहे. याखेरीज वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व्हिस रोडची रुंदी वाढविण्यात यावी. नगरपंचायतीची पाणीलाईन आणि गटारलाईन उभारून देण्यात यावी. तसेच मागील आठवड्यात ज्या ज्या ठिकाणी संयुक्त पाहणी झाली तेथील कामे पुढील चार दिवसांत व्हायला हवी़त. पावसाळ्यात शहरात पाणी साठण्याची समस्या कुठेही होता नये. जर समस्या उद्भवली तर गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग