शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ : नीतेश राणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:26 IST

कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.

ठळक मुद्देसमस्यांवर तोडगा काढा, अन्यथा माझ्याशी गाठ  : नीतेश राणे यांचा इशारा लोकांच्या मागणीप्रमाणेच कणकवलीत काम झाले पाहिजे

कणकवली : कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत बसलात का? शहराची जबाबदारी कोण घेणार? सर्व समस्या लवकरात लवकर न सुटल्यास माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नीतेश राणे यांनी खडसावले.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर रवी कुमार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, स्वाभिमानचे शहराध्यक्ष राकेश राणे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, सचिन म्हाडगुत, अनिल शेटये, शिशिर परूळेकर, सोमनाथ गायकवाड, रामदास मांजरेकर, संदीप नलावडे, अभय राणे, किशोर राणे, आनंद राणे यांच्यासह प्रकल्पबाधित व शहरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, पावसाळ्यात तुम्हांला कणकवलीला बुडवायचे आहे का? आम्ही जमिनी दिल्या, त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणेच काम झाले पाहिजे़. कणकवलीत चौपदरीकरणाचे काम तुम्ही करता ना? मग वाहतूक कोंडी, तुंबलेली गटारे, धुळीच्या प्रादुर्भावावर कोण काम करणार? केलेल्या कामावर कोण पाणी मारणार? सर्व्हिस रोड केव्हा पूर्ण करणार? तुटलेली पाईपलाईन केव्हा सुरळीत करणार? पथदीप बंद केले ते कधी चालू करणार? या सगळ्या प्रश्नांवर तुम्हीच काम केले पाहिजे़ नुसती बोलबच्चनगिरी आता बंद करा. गोड बोलून आम्ही फसणार नाही, अशा शब्दांत प्रकाश शेडेकर यांच्यावर नीतेश राणे यांनी आगपाखड केली. जनतेच्या अडचणी न सोडविल्यास कणकवलीचा आमदार म्हणून मी गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, कणकवलीत नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे काम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने इमारती तोडू नयेत. अधिकारी काय कणकवलीचे जावई नाहीत. माझ्याकडे यापुढे कोणत्याही तक्रारी येता नयेत. एक जरी तक्रार आली तरी गप्प बसणार नाही, अशा सूचनाही राणे यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीचे ठेकेदार रवी कुमार आणि प्रकाश शेडेकर यांना दिल्या.यावेळी संतप्त झालेल्या आमदार राणे यांनी काही वेळातच या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका मांडत पुढील कार्यक्रमासाठी जाणे पसंत केले. त्यानंतर प्रकाश शेडेकर यांनी कणकवलीतील धुळीचा प्रादुर्भाव, सर्व्हिस रस्ते, स्ट्रीटलाईट तसेच धुळीवर पाणी मारण्याचे काम केले जाईल. तसेच गांगोमंदिर येथील अंडरपास जागेच्या ठिकाणी काम करणार नसल्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे यांच्यासह शहरातील नागरिकांनीही विविध प्रश्नांवर शेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले....तर महामार्गाचे काम बंद पाडणार!शहरातील गांगो मंदिर येथे अंडरपास व्हायलाच हवा. हे काम न झाल्यास डीपी रस्त्यापुढील उड्डाणपुलाचा एकही पिलर उभा करू दिला जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी महामार्ग दुतर्फा सर्व गटार बांधकामे आणि सांडपाणी निचरा व्यवस्था व्हायला हवी. याबाबत दिरंगाई झाली तर महामार्गाचे काम रोखू.

शहरात दिवसातून तीन वेळा रस्त्यावर पाणी मारणे अत्यावश्यक आहे. याखेरीज वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व्हिस रोडची रुंदी वाढविण्यात यावी. नगरपंचायतीची पाणीलाईन आणि गटारलाईन उभारून देण्यात यावी. तसेच मागील आठवड्यात ज्या ज्या ठिकाणी संयुक्त पाहणी झाली तेथील कामे पुढील चार दिवसांत व्हायला हवी़त. पावसाळ्यात शहरात पाणी साठण्याची समस्या कुठेही होता नये. जर समस्या उद्भवली तर गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग