शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तळाशिलला उधाणाचा तडाखा, धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:48 IST

मालवण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलग दुसºया दिवशी उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी, तळाशिल गावांसह आचरा गावालाही बसला. तोंडवळी, तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत समुद्राचे पाणी मधली तळाशिल येथील भागात घुसल्याने जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.

ठळक मुद्दे तळाशिलला उधाणाचा तडाखा, धोका वाढला खाडीचे पाणी जामडूलमधील लोकवस्तीत घुसले; किनाऱ्यावरील ग्रामस्थ भयभीत

आचरा : मालवण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी, तळाशिल गावांसह आचरा गावालाही बसला. तोंडवळी, तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत समुद्राचे पाणी मधली तळाशिल येथील भागात घुसल्याने जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.

समुद्राच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. खाडी व सागर किनारा यांच्यातील अंतर काही मीटरच राहिल्याने तळाशिल भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी आलेल्या उधाणाच्या भरतीचा आचरा जामडूल बेटालाही फटका बसला असून खाडीचे पाणी जामडूलमधील लोकवस्तीत घुसले होते. हे उधाण आणखी टिकणार असल्याने धोका वाढला आहे. भयभीत ग्रामस्थांनी शासनाकडे जामडूल बेटासाठी बंधाऱ्याची मागणी केली आहे.

आचरा-जामडूल बेटावर उधाणाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत घुसले होते. त्यामुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.रविवारी आलेल्या उधाणामुळे पुन्हा तोंडवळी, तळाशिल गावांच्या किनारी भागाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षीप्रमाणे सलग आलेल्या उधाणात तोंडवळी किनाऱ्याचा काही मीटर रुंदीचा भाग काही क्षणांत समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने समुद्रात विलीन झाला. तोंडवळीतील ग्रामस्थ व मच्छिमारांवर किनाऱ्यावर बसून होणारी धूप पाहण्याची वेळ आली होती.

तळाशिल रस्त्यापर्यंत समुद्राचे पाणी येण्यास अवघे २० फुटाचे अंतर राहिले होते. या किनाऱ्यालगतच असलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. मुख्य विद्युत वाहिनीचे खांबही धोकादायक झाले आहेत. रौद्ररूप धारण करीत उंचच उंच लाटा लोकवस्तीपासून काही फुटांवर येऊन आदळत असल्याचे चित्र रविवारी तळाशिल येथे दिसत होते. एका बाजूने समुद्र आक्रमण करीत असताना दुसºया बाजूने खाडीचे पाणी लोकवस्तीत घुसले होते. त्यामुळे स्थानिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता.आचरा-पिरावाडी रस्त्यावर पाणी; वाहतूक ठप्पउधाणाचा फटका तोंडवळीसह आचरा गावाला बसला आहे. उधाणाचे पाणी जामडूल बेटावरील लोकवस्तीत घुसले होते. भयभीत झालेले ग्रामस्थ घरातून बाहेर पडत रस्त्यावर येऊन थांबले होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर हे जामडूल बेटावर थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी जामडूल बेटाला सुरक्षिततेसाठी बंधारा नसल्याने दरवर्षी या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे सांगत उधाणाचे पाणी वाढले की जीव मुठीत धरून रहावे लागत असल्याचे जामडूल येथील ग्रामस्थांनी सांगितले. आचरा-पिरावाडीला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग