शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना देशोधडीला लावणारी ‘जेटी’ नकोच

By admin | Updated: July 16, 2015 00:21 IST

गोकुळदास मोटे : प्रदूषणकारी प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न...

सावंतवाडी : तळवणे - आरोंदा खाडीकिनारी स्थानिक मच्छीमार पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने मासेमारी व खाडीतून उत्पन्न मिळवून मच्छीमार हक्कांचे व पारंपरिक संस्कृतीचे जतन करून आपले जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत प्रकल्पाला विरोध असतानासुद्धा शासन जबरदस्तीने प्रदूषणकारी प्रकल्प राबवून मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. याला आमचा विरोध असून, जेटी प्रकल्प शासनाने रद्द करावा, अशी मागणी मच्छीमार अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. भारत देशात शेतकऱ्यांसाठी कूळ वहिवाट कायदा लागू होतो, तर मग मच्छीमारांना का होऊ शकत नाही? भारतीय कूळ वहिवाट कायदा १८८२ नुसार मच्छीमारांना कायद्याने लागू आहे. ज्या खाडीक्षेत्रात मच्छिमार मासेमारी व्यवसाय करतात, ते संपूर्ण खाडीक्षेत्र कायद्याने मच्छीमारांच्या मालकी हक्काचे आहे. असे प्रकल्प खाडी क्षेत्रात आणण्यापूर्वी खाडी किनारी असलेल्या सर्व मच्छीमार बांधवांचे जनमत घेतले पाहिजे होते. परंतु ते घेतले नाही. याचा अर्थ असा की, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मच्छीमारांवर शासन खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोकुळदास मोटे यांनी केला आहे. पर्यटनाच्या बाबतीत सावरजुवे ते मानशीवाडीपर्यंत खाडी किनारा उंच, रुंद व भक्कम असा सिमेंट काँक्रिट पद्धतीची भिंत घालून बंधारा मजबूत करावा. याला आमचा विरोध नाही. बंधाऱ्यावर काही अडथळे असतील, ते दूर करावेत. खाडी पात्रात पर्यटनाच्या बाबतीत आमचा विरोध नाही. परंतु याबाबत पर्यटन महामंडळाने मच्छीमार बांधवांची स्वतंत्र बैठक घ्यावी, असे मोठे यांनी म्हटले आहे. राजन तेलींना वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांचे डोळे फोडणार, असे दानवेंनी वृत्तपत्रात म्हटले आहे. त्यानुसार आरोंदा जेटीच्या बाबतीत राजन तेली यांना वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मच्छीमार लोकांचे डोळे दानवेंनी आरोंद्यात येऊन फोडावेत, नाही तर राजकारण सोडून भगवे कपडे घालून संन्यासाला बसावे, असे आक्रमक मत व्यक्त करत सत्तेच्या जोरावर उड्या मारू नयेत, असे मच्छीमार अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)