शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जिल्हा साहित्य संमेलन १८ रोजी

By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी संमेलनाची रूपरेषा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य संमेलनातर्फे १८ रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाची रूपरेषा विषद केली. सकाळी ८ वाजता मारूती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अशोक नायगावकर, प्रमुख अतिथी म्हणून मधु मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, डॉ. महेश केळुस्कर, उर्मिला पवार, अरूण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद बोंद्रे ‘संगमेश्वरी’, निधी पटवर्धन ‘दालदी’, मिलिंद पेडणेकर ‘मालवणी’, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ‘खारवी’ बोली भाषेविषयी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘साहित्य व आजचा युवक’ विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थान डॉ. विद्याधर करंदीकर भूषवणार आहेत. यामध्ये चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान उर्मिला पवार भूषवणार आहेत. यामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रध्दा राणे, प्रा. वर्षा फाटक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता प्रकट कथा वाचन श्रीकांत पाटील, मिलिंद पेडणेकर करणार असून, प्र. ल. मयेकरांच्या कथांचे वाचन करणार आहेत. सायंकाळी ४.४५ वाजता कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान अरूण म्हात्रे भूषविणार असून, कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुस्कर, अशोक बागवे, शाखानिहाय ३ प्रमाणे २७ कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)शाखानिहाय तीन याप्रमाणे २७ कवी सहभागी होणार.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार.विविध परिसंवादाबरोबरच अन्य कार्यक्रमांचेही आयोजन.साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.