शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

जिल्हा साहित्य संमेलन १८ रोजी

By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी संमेलनाची रूपरेषा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य संमेलनातर्फे १८ रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाची रूपरेषा विषद केली. सकाळी ८ वाजता मारूती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अशोक नायगावकर, प्रमुख अतिथी म्हणून मधु मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, डॉ. महेश केळुस्कर, उर्मिला पवार, अरूण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद बोंद्रे ‘संगमेश्वरी’, निधी पटवर्धन ‘दालदी’, मिलिंद पेडणेकर ‘मालवणी’, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ‘खारवी’ बोली भाषेविषयी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘साहित्य व आजचा युवक’ विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थान डॉ. विद्याधर करंदीकर भूषवणार आहेत. यामध्ये चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान उर्मिला पवार भूषवणार आहेत. यामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रध्दा राणे, प्रा. वर्षा फाटक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता प्रकट कथा वाचन श्रीकांत पाटील, मिलिंद पेडणेकर करणार असून, प्र. ल. मयेकरांच्या कथांचे वाचन करणार आहेत. सायंकाळी ४.४५ वाजता कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान अरूण म्हात्रे भूषविणार असून, कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुस्कर, अशोक बागवे, शाखानिहाय ३ प्रमाणे २७ कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)शाखानिहाय तीन याप्रमाणे २७ कवी सहभागी होणार.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार.विविध परिसंवादाबरोबरच अन्य कार्यक्रमांचेही आयोजन.साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.