शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणा

रत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणारत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)