शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणा

रत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या ‘झोपा’?अनेक तक्रारी : कारवाईबाबत मात्र ढिम्मपणारत्नागिरी : ‘मॅगी’वर बंदी आल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या चायनीज फूडवरील संभाव्य कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात चायनीजच नव्हे; तर विक्री होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्येही घातक रसायनांची भेसळ असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, याबाबतीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या ‘झोपा’ सुरू असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळीबाबत कोणतीही मोठी कारवाईच झाली नसल्याने शासनाचा हा विभाग जिल्ह्यात आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात चायनीज व्यवसायाला बरकत आली आहे. मात्र, या चायनीज पदार्थात अजिनोमोटोसारखा घातक पदार्थ वापरला जातो. त्यामुळे चायनीज सेंटर्समधील खाद्य खाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मॅगीनंतर चायनीजवर गाज येणार असल्याची चर्चा असतानाच जिल्ह्यात किती चायनीज सेंटर्सना परवाने दिले आहेत, याची माहिती सांगण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सक्षम अधिकारीच नाहीत. साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरणच्या इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी माहिती घेण्यास गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यानी आपणास असे किती परवाने जिल्ह्यात दिले गेले आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. रत्नागिरीच्या या कार्यालयात परवाना अधिकारीच नसल्याने या रिक्त पदाचा भार ठाणे कार्यालयाचे परवाना अधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. हे प्रभारी अधिकारी पंधरा दिवसानी येतात, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळेच जिल्ह्यातील खाद्यपदार्थांतील भेसळीबाबत शासनाचा हा विभाग किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शहरांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची सेंटर्स आहेत. त्याशिवाय गावा-गावांतही चायनीज सेंटर्स सुरू झाली असून, या सेंटर्सची संख्या हजारच्यावर आहे. मात्र, त्यांची नोंदणीच अत्यल्प झाली आहे. असंख्य सेंटर्स ही कोणाच्या तरी आशीर्वादाने महिन्याची देणगी देत चालू आहेत. काही जणांना फेरीवाल्याचे परवाने देण्यात आले आहेत. सायंकाळच्यावेळी सुरू होणारी ही सेंटर्स रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत खुली असतात. तेथे चायनीज पदार्थांचा आस्वाद घेण्यास अनेकजण येतात. हे पदार्थ अत्यंत लोकप्रियही आहेत. मात्र, ते खाणे आरोग्याला किती घातक आहे, याची कोणतीही कल्पना सामान्य माणसांना नाही. असे असताना भेसळ करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन उदार आहे काय, असा सवालही केला जात आहे. (प्रतिनिधी)