शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus In Sindhudurg : जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण राबवावे : संजीव लिंगवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:24 IST

CoronaVirus In Sindhudurg : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण राबवावे : संजीव लिंगवत अन्यथा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा धोका

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के व सातारा जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकावर २०.०२ टक्के इतका होता. जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा ह्यरेड झोनह्णमध्ये दाखल झाला असून, कोरोना रोखण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील मृत्यूदर कायम असून शेकडो कुटुंब नेस्तनाबूत होत आहेत.

ग्रामीण भागात दोन-चार गावांत फक्त एकच आरोग्य सेवक असलेल्या व बऱ्याच रंगविलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्र, उपकेंद्र यात डॉक्टर व पुरेसा आरोग्य कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात पुरेशी कोरोना जनजागृती होत नाही. परिणामी खूप रुग्ण अजूनही घरात व गावात मोकाट फिरत आहेत.संपूर्ण राज्यात होमिओपॅथी डॉक्टर यांची भरती कोविडसाठी होत असतानाही व जिल्ह्यात जवळपास चारशे होमिओपॅथिक डॉक्टर असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतीत होमिओपॅथी डॉक्टरना डावलले. पुरेशा खाटांची व्यवस्था नसतानाही होम विलगीकरण बंद करणे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्यात सुसंवादातून निर्णय नसणे.

योग्य निर्णय घेण्यात अकार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांचा जिल्हा प्रशासनावर अंमल नसणे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरना साठ हजार ते पंचेचाळीस हजार मानधन असताना जिल्ह्यात आयुर्वेदिक डॉक्टरना फक्त तीस हजार रुपये मानधन देऊन कोविड वॉर्डात बारा-बारा तासांच्या ड्युट्या देणे. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी वर्गाना चुकीच्या पद्धतीने हाताळणे व अधिकारी वर्गावर अंमल नसणे आदी अनेक कारणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यास कुचकामी ठरली आहे.यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणे व जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण वेळीच न राबविल्यास परिस्थिती अजूनही चिंताजनक होण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे. तर, रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी दुसऱ्या तर कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग