शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

CoronaVirus In Sindhudurg : जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण राबवावे : संजीव लिंगवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:24 IST

CoronaVirus In Sindhudurg : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण राबवावे : संजीव लिंगवत अन्यथा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा धोका

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण न राबविल्यास जिल्ह्यात धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे.गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के व सातारा जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकावर २०.०२ टक्के इतका होता. जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा ह्यरेड झोनह्णमध्ये दाखल झाला असून, कोरोना रोखण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील मृत्यूदर कायम असून शेकडो कुटुंब नेस्तनाबूत होत आहेत.

ग्रामीण भागात दोन-चार गावांत फक्त एकच आरोग्य सेवक असलेल्या व बऱ्याच रंगविलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्र, उपकेंद्र यात डॉक्टर व पुरेसा आरोग्य कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात पुरेशी कोरोना जनजागृती होत नाही. परिणामी खूप रुग्ण अजूनही घरात व गावात मोकाट फिरत आहेत.संपूर्ण राज्यात होमिओपॅथी डॉक्टर यांची भरती कोविडसाठी होत असतानाही व जिल्ह्यात जवळपास चारशे होमिओपॅथिक डॉक्टर असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतीत होमिओपॅथी डॉक्टरना डावलले. पुरेशा खाटांची व्यवस्था नसतानाही होम विलगीकरण बंद करणे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्यात सुसंवादातून निर्णय नसणे.

योग्य निर्णय घेण्यात अकार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांचा जिल्हा प्रशासनावर अंमल नसणे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरना साठ हजार ते पंचेचाळीस हजार मानधन असताना जिल्ह्यात आयुर्वेदिक डॉक्टरना फक्त तीस हजार रुपये मानधन देऊन कोविड वॉर्डात बारा-बारा तासांच्या ड्युट्या देणे. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी वर्गाना चुकीच्या पद्धतीने हाताळणे व अधिकारी वर्गावर अंमल नसणे आदी अनेक कारणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यास कुचकामी ठरली आहे.यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणे व जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करून नवीन धोरण वेळीच न राबविल्यास परिस्थिती अजूनही चिंताजनक होण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉ. संजीव लिंगवत यांनी दिला आहे. तर, रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी दुसऱ्या तर कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग