शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 10:39 IST

महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २५

ठळक मुद्दे शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ

दोडामार्ग : महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

२५ लाख रुपये खर्चून राष्ट्रीय  पेयजलमधून विहिर व पंपहाऊस बसविण्यात आला खरा, मात्र पाईप लाईन टाकण्यासाठी निधीच नाही अशा अवस्थेत गेल्या तीन वर्षापासून शिरंगे धरणग्रस्त पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या धरणासाठी ग्रामस्थांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. घरादारावर पाणी सोडले, या धरणग्रस्तांचे पुनर्वसन खानयाळे येथे करण्यात आले. मात्र, ज्यांनी धरणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याच धरणग्रस्तांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात ही परिस्थिती निर्माण होते. मात्र प्रशासन आणि जनतेचे कैवारी म्हणवणारे राजकीय पुढाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे.शिरंगे पुनर्वसन गावची लोकसंख्या जेमतेम ५०० च्या आसपास आहे. या ठिकाणी पुनर्वसन झाल्यावर पुनर्वसन विभागाने गावठाणचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण केले आणि बोडण ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सण २०१६-१७ मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजलमधून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी निधिच नसल्याने नळयोजनेचे काम रखडले. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून शिरंगे पुनर्वसनवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विहिरींनी गाठला पाण्याचा तळसध्या पूनर्वसन गावठणात तीन विहिरी आहेत. त्यापैकी दोन विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जेमतेम आठ दिवस पुरेल एवढेच पाणी त्यात शिल्लक आहे. तर राष्ट्रीय  पेयजलच्या विहिरीत पाणी मुबलक आहे. मात्र तीन वर्षांपासून त्यातील पाणी उपसा व गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत शिरंगे धरणगस्तांची व्यथा दूर करण्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्यावरच पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागत असल्याने धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीशिरंगे पुनर्वसन गावठणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या आहे. मात्र ती दूर करण्याच्यादृष्टीने कोणतीच पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परीणामी चालू वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी धरणग्रस्तांमधून केली जात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग