शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 10:39 IST

महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २५

ठळक मुद्दे शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ

दोडामार्ग : महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

२५ लाख रुपये खर्चून राष्ट्रीय  पेयजलमधून विहिर व पंपहाऊस बसविण्यात आला खरा, मात्र पाईप लाईन टाकण्यासाठी निधीच नाही अशा अवस्थेत गेल्या तीन वर्षापासून शिरंगे धरणग्रस्त पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या धरणासाठी ग्रामस्थांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. घरादारावर पाणी सोडले, या धरणग्रस्तांचे पुनर्वसन खानयाळे येथे करण्यात आले. मात्र, ज्यांनी धरणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याच धरणग्रस्तांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात ही परिस्थिती निर्माण होते. मात्र प्रशासन आणि जनतेचे कैवारी म्हणवणारे राजकीय पुढाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे.शिरंगे पुनर्वसन गावची लोकसंख्या जेमतेम ५०० च्या आसपास आहे. या ठिकाणी पुनर्वसन झाल्यावर पुनर्वसन विभागाने गावठाणचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण केले आणि बोडण ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सण २०१६-१७ मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजलमधून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी निधिच नसल्याने नळयोजनेचे काम रखडले. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून शिरंगे पुनर्वसनवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विहिरींनी गाठला पाण्याचा तळसध्या पूनर्वसन गावठणात तीन विहिरी आहेत. त्यापैकी दोन विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जेमतेम आठ दिवस पुरेल एवढेच पाणी त्यात शिल्लक आहे. तर राष्ट्रीय  पेयजलच्या विहिरीत पाणी मुबलक आहे. मात्र तीन वर्षांपासून त्यातील पाणी उपसा व गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत शिरंगे धरणगस्तांची व्यथा दूर करण्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्यावरच पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागत असल्याने धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीशिरंगे पुनर्वसन गावठणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या आहे. मात्र ती दूर करण्याच्यादृष्टीने कोणतीच पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परीणामी चालू वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी धरणग्रस्तांमधून केली जात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग