शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:54 IST

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ...

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम निर्माण केला आणि ते जेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त ठेके हे माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणेंना यानाच दिले असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

केसरकर जरी राणेचा दहशतवाद संपला म्हणून सांगत असले तरी तो सत्तेसाठी असून दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ हेच यामागचे त्याचे धोरण असल्याची टिका ही अंधारे यांनी यावेळी केली.त्या बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी,जिल्हाप्रमुख संजय पडते,रूपेश राऊळ,जान्हवी सावंत,चंद्रकांत कासार,चंद्रकांत गावडे,मायकल डिसोजा आदि उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहि नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता हा तिथेच आहे.  मंत्री केसरकर यांच्या छुपा दहशतवाद सर्वाना कळून चुकला आहे.आता पर्यत रोजगाराची अनेक आश्वासने त्यांनी दिली पण प्रत्यक्षात काथ्या कारखाना,चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले ते सांगू शकले नाहीत.आता येथील जनता केसरकर यांच्या भुलभुलेय्याना फासणारी नाही.निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे.दहशतवाद म्हणून ओरड मारून मते घेतली आणि आता तेच राणेचा दहशतवाद संपला म्हणतात मग हा दहशतवाद सत्तेसाठी संपला म्हणायचा का?म्हणजे सत्तेसाठी दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ असेच यांचे धोरण असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतना अनेक ठेके  राणेंनाच देत असत मग दहशतवाद कसला म्हणायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.जे 40 आमदार सोडून गेले आहेत त्यातील अनेक जण आमच्या सर्पकात आहेत.त्यात मंत्री दीपक केसरकर नाहीत कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही थांबणार नसून भाजपात जाणार असल्याचा गौप्यस्फोट अंधारे यांनी केला आहे.

राष्ट्रीय राजकारणात भाजप विरोधी मोठ बांधायची आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिका ऐवढे छोटे कारण नसून ते राष्ट्रीय राजकारणात सर्व युवा चेहरे एकत्र येऊन भाजप विरोधी एक मोठ बांधणे गरजेचे आहे.जे देशात राजकारण सुरू आहे.ते थांबवण्याची गरज असून सगळे युवा चेहरे एकत्र आल्यास नक्कीच त्यात बदल होईल.कर्नाटकने घेतलेला निर्णय म्हणजे भाजपची कुटील नितीकर्नाटक सरकार ने सांगली जिल्ह्य़ातील 40 गावावर दावा सांगितला तो दावा म्हणजे भाजप च्या राजकारणाचा कुटील डाव असून,हे कुठेतरी थांबले पाहिजे जे 40 जण शिवसेनेतून गेले आहेत ते गप्प का? बसले आहेत ते दिल्लीतील अमराठी नेत्यासमोर गप्प का बसतात असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी केला आहे.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDeepak Kesarkarदीपक केसरकर