शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:54 IST

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ...

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम निर्माण केला आणि ते जेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त ठेके हे माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणेंना यानाच दिले असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

केसरकर जरी राणेचा दहशतवाद संपला म्हणून सांगत असले तरी तो सत्तेसाठी असून दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ हेच यामागचे त्याचे धोरण असल्याची टिका ही अंधारे यांनी यावेळी केली.त्या बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी,जिल्हाप्रमुख संजय पडते,रूपेश राऊळ,जान्हवी सावंत,चंद्रकांत कासार,चंद्रकांत गावडे,मायकल डिसोजा आदि उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहि नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता हा तिथेच आहे.  मंत्री केसरकर यांच्या छुपा दहशतवाद सर्वाना कळून चुकला आहे.आता पर्यत रोजगाराची अनेक आश्वासने त्यांनी दिली पण प्रत्यक्षात काथ्या कारखाना,चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले ते सांगू शकले नाहीत.आता येथील जनता केसरकर यांच्या भुलभुलेय्याना फासणारी नाही.निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे.दहशतवाद म्हणून ओरड मारून मते घेतली आणि आता तेच राणेचा दहशतवाद संपला म्हणतात मग हा दहशतवाद सत्तेसाठी संपला म्हणायचा का?म्हणजे सत्तेसाठी दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ असेच यांचे धोरण असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतना अनेक ठेके  राणेंनाच देत असत मग दहशतवाद कसला म्हणायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.जे 40 आमदार सोडून गेले आहेत त्यातील अनेक जण आमच्या सर्पकात आहेत.त्यात मंत्री दीपक केसरकर नाहीत कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही थांबणार नसून भाजपात जाणार असल्याचा गौप्यस्फोट अंधारे यांनी केला आहे.

राष्ट्रीय राजकारणात भाजप विरोधी मोठ बांधायची आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिका ऐवढे छोटे कारण नसून ते राष्ट्रीय राजकारणात सर्व युवा चेहरे एकत्र येऊन भाजप विरोधी एक मोठ बांधणे गरजेचे आहे.जे देशात राजकारण सुरू आहे.ते थांबवण्याची गरज असून सगळे युवा चेहरे एकत्र आल्यास नक्कीच त्यात बदल होईल.कर्नाटकने घेतलेला निर्णय म्हणजे भाजपची कुटील नितीकर्नाटक सरकार ने सांगली जिल्ह्य़ातील 40 गावावर दावा सांगितला तो दावा म्हणजे भाजप च्या राजकारणाचा कुटील डाव असून,हे कुठेतरी थांबले पाहिजे जे 40 जण शिवसेनेतून गेले आहेत ते गप्प का? बसले आहेत ते दिल्लीतील अमराठी नेत्यासमोर गप्प का बसतात असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी केला आहे.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDeepak Kesarkarदीपक केसरकर