शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

Sindhudurg: ११ लाखांचा निधी खर्च केला, पावसाच्या सुरुवातीलाच कासार्डे येथील रस्ता खड्ड्यात गेला 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:23 IST

रस्ता झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच पावसात रस्ताची दुर्दशा

निकेत पावसकरतळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल ब्रीज ते तळेरे पियाळीमार्गे फोंडा रस्त्याला जोडणारा आंबा स्टॉपपर्यंतच्या रस्त्यावर भले मोठ्ठे खड्डे पडले आहेत. एप्रिल, मेमध्येच या रस्त्यावर सुमारे ११ लाखांचा निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले होते. पावसाच्या सुरुवातीलाच लाखांचा निधी खड्ड्यात गेला आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत व पावसाळ्यानंतर पुन्हा रस्ता मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल ब्रीज ते तळेरे पियाळीमार्गे फोंडा या रस्त्याचा काही भाग एप्रिल-मेमध्ये नूतनीकरण करण्यात आले आणि पावसाच्या सुरुवातीलाच मान्सून सक्रिय होण्यापूर्वी या रस्त्याची अक्षरक्ष: दुरवस्था होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. यावरून पादचारी व वाहने यांना मार्ग काढत जावे लागत आहे. मुळात संबंधित विभागाचे या मार्गावर गेली काही वर्षे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असताना यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाखांचा निधी खर्च करून रस्ता करण्यात आला होता.मुंबई-गोवा महामार्गावरून तळेरे पियाळी, गडमठ मार्गे फोंड्याकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून कासार्डे ब्राह्मणवाडी बॉक्सवेल पुलाखालून आंबा स्टॉप असा रस्ता यावर्षी केला आहे. सध्या या रस्त्याची अवस्था पाहता मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. परिणामी गुडघाभर खड्डे पडून त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्याची रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

लाखो रुपयांचा निधी खड्ड्यातया रस्त्याचे नूतनीकरण एप्रिल-मेमध्ये म्हणजेच एक ते दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. यासाठी सुमारे ११ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, हा सगळा निधी अक्षरश: खड्ड्यात गेल्याची चर्चा केली जात आहे. त्यात तळगाव ते कलमठ टप्यात काम करणाऱ्या महामार्ग ठेकेदार कंपनीचे कार्यालय, सिमेंट, खडी प्लांट वाहनस्थळ यापूर्वीच या ठिकाणी होते, त्यामुळे अनेक वाहने याच मार्गावर ये-जा करत होती. तसेच कासार्डे मायनिंग क्षेत्रातील अतिजड वाहने याच मार्गावरून मुंबई गोवा महामार्गावर येत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली होती.

नागरिकांची नाराजीगेली अनेक वर्षे हा रस्ता खड्डेमय असून, यावर्षी रस्ता झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच पावसात या रस्ताची दुर्दशा झाल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त करीत आहेत. तरी तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे व पावसानंतर पुन्हा संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक