शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाबाबत व्यापाऱ्यांमध्ये मतभेद

By admin | Updated: August 22, 2014 22:57 IST

कणकवलीत व्यापाऱ्यांची बैठक : विस्थापितांना सहकार्य करण्याचा निर्णय

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कणकवली शहरातूनच जाणे आवश्यक आहे, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. तर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी बायपास हाच योग्य पर्याय आहे, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे असल्याने महामार्ग चौपदरीकरणाबाबतच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत मतभिन्नता दिसून आली. मात्र, या महामार्गामुळे विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.येथील नगरवाचनालयाच्या पू. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात कणकवली शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उदय वरवडेकर, विलास कोरगांवकर, जयेश धुमाळे, डॉ. चंद्रकांत राणे, बाबू वळंजू, अ‍ॅड. विलास परब, व्यापारी संघाचे महेश नार्वेकर, बंडू खोत, नगरसेवक कन्हैय्या पारकर, अनिल मांजरेकर, माळवदे आदी व्यापारी उपस्थित होते.यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जे व्यावसायिक विस्थापित होणार आहेत त्यांनी शहराबाहेरून हा मार्ग नेण्यात यावा अशी आपली भूमिका स्पष्ट केली तर काही व्यापाऱ्यांनी शहरातूनच महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी आपली भूमिका मांडली. बाजारपेठेमधून ओव्हरब्रीज किंवा बॉक्सेल रोड व्हावा याबाबतही बराचवेळ चर्चा करण्यात आली. शहरातून ओव्हरब्रीज झाला तर शहरातील व्यवसायावर परिणाम होणार आहे. नव्या कायद्यानुसार या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने बाजारभावाच्या अनेकपटीने नुकसान भरपाई व्यापाऱ्यांना मिळेल. अनेक प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेले शेतकरी, घरांचे मालक यांचे विस्थापन शासनाकडून होते. मात्र व्यापाऱ्यांच्या विस्थापनाबाबत कोणतीही तरतूद नसल्याची माहिती अ‍ॅड. विलास परब यांनी यावेळी दिली.कणकवली शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग गेला तर शहरातील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी भिती बाबू वळंजू यांनी व्यक्त केली. चौपदरीकरण महामार्गाच्या लगत दुकाने वसवता येत नाहीत. काही अंतर आणि सर्व्हिस रस्ता असेल तरच दुकाने मांडता येतात. त्यामुळे चौपदरीकरण शहरातून झाले किंवा शहराबाहेरून झाले तरी त्याचा व्यवसायावर फारसा परिणाम होत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारपेठांमधील व्यापार, विकास आणि महामार्ग चौपदरीकरण यांचा फारसा संबंध नाही अशी भूमिका जयेश धुमाळे यांनी मांडली. महामार्ग चौपदरीकरणाबाबत अनेक व्यापाऱ्यांनी विविध मुद्दे मांडले. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. (वार्ताहर)