शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

धर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे , सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:26 IST

देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालाचौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने विषयावर आवटे यांचे व्याख्यान

सावंतवाडी : देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.येथील श्रीराम वाचन मंदिर आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, सदस्य प्रसाद पावसकर उपस्थित होते.यावेळी आवटे म्हणाले, बहुसंख्य वाद म्हणजे लोकशाही या विचारात आपण आहोत. यातूनच जमातवाद उदयास येत आहे आणि ही गोष्ट भारतासारख्या देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहे.

पूर्वीही जमातवादाने भयंकर रुप घेतल्या गेलेल्या अनेक घटना आहेत. आणि त्याला सर्वसामान्य माणून बळी पडला आहे. देशात जेवढी हत्याकांडे व दंगली झाल्या, त्यानंतरचा काळ निवडणुकीचाच असायचा. त्यामुळे यामागे निवडणुकीची पार्श्वभूमीच दिसून येते.

या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरलाच नोटाबंदी होणार आहे हे माहीत नसते, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, या सर्व बाबी लोकशाहीच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाला विचारात पाडतात.हा देश हुकूमशाहीकडे जाईल अशी आज भीती निर्माण झाली आहे. हा देश अशांच्या हाती आला आहे ज्यांना सेल्फीशिवाय काही कळत नाही. पटेल आंदोलन, गुजरात आंदोलन, कोरेगाव-भीमा हे जाणीवपूर्वक निर्माण करुन समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहेत.

आज मुलभूत प्रश्नांचा विचार करता राजसंस्था घराघरात येऊन घुसली आहे. अनेक चुकीच्या धारणा निर्माण करून हिंदुत्ववाद व उदारमतवाद यात प्रचंड तेढ निर्माण करते आहे. विचारांचा आगडोंब निर्माण होत आहे. या प्रत्येक विकाराला उत्तर सलोखा व प्रेमाने देऊ शेकतो, असे आवटे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक