शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

धर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे , सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:26 IST

देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालाचौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने विषयावर आवटे यांचे व्याख्यान

सावंतवाडी : देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.येथील श्रीराम वाचन मंदिर आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, सदस्य प्रसाद पावसकर उपस्थित होते.यावेळी आवटे म्हणाले, बहुसंख्य वाद म्हणजे लोकशाही या विचारात आपण आहोत. यातूनच जमातवाद उदयास येत आहे आणि ही गोष्ट भारतासारख्या देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहे.

पूर्वीही जमातवादाने भयंकर रुप घेतल्या गेलेल्या अनेक घटना आहेत. आणि त्याला सर्वसामान्य माणून बळी पडला आहे. देशात जेवढी हत्याकांडे व दंगली झाल्या, त्यानंतरचा काळ निवडणुकीचाच असायचा. त्यामुळे यामागे निवडणुकीची पार्श्वभूमीच दिसून येते.

या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरलाच नोटाबंदी होणार आहे हे माहीत नसते, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, या सर्व बाबी लोकशाहीच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाला विचारात पाडतात.हा देश हुकूमशाहीकडे जाईल अशी आज भीती निर्माण झाली आहे. हा देश अशांच्या हाती आला आहे ज्यांना सेल्फीशिवाय काही कळत नाही. पटेल आंदोलन, गुजरात आंदोलन, कोरेगाव-भीमा हे जाणीवपूर्वक निर्माण करुन समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहेत.

आज मुलभूत प्रश्नांचा विचार करता राजसंस्था घराघरात येऊन घुसली आहे. अनेक चुकीच्या धारणा निर्माण करून हिंदुत्ववाद व उदारमतवाद यात प्रचंड तेढ निर्माण करते आहे. विचारांचा आगडोंब निर्माण होत आहे. या प्रत्येक विकाराला उत्तर सलोखा व प्रेमाने देऊ शेकतो, असे आवटे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक