शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे , सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:26 IST

देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालाचौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने विषयावर आवटे यांचे व्याख्यान

सावंतवाडी : देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.येथील श्रीराम वाचन मंदिर आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, सदस्य प्रसाद पावसकर उपस्थित होते.यावेळी आवटे म्हणाले, बहुसंख्य वाद म्हणजे लोकशाही या विचारात आपण आहोत. यातूनच जमातवाद उदयास येत आहे आणि ही गोष्ट भारतासारख्या देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहे.

पूर्वीही जमातवादाने भयंकर रुप घेतल्या गेलेल्या अनेक घटना आहेत. आणि त्याला सर्वसामान्य माणून बळी पडला आहे. देशात जेवढी हत्याकांडे व दंगली झाल्या, त्यानंतरचा काळ निवडणुकीचाच असायचा. त्यामुळे यामागे निवडणुकीची पार्श्वभूमीच दिसून येते.

या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरलाच नोटाबंदी होणार आहे हे माहीत नसते, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, या सर्व बाबी लोकशाहीच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाला विचारात पाडतात.हा देश हुकूमशाहीकडे जाईल अशी आज भीती निर्माण झाली आहे. हा देश अशांच्या हाती आला आहे ज्यांना सेल्फीशिवाय काही कळत नाही. पटेल आंदोलन, गुजरात आंदोलन, कोरेगाव-भीमा हे जाणीवपूर्वक निर्माण करुन समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहेत.

आज मुलभूत प्रश्नांचा विचार करता राजसंस्था घराघरात येऊन घुसली आहे. अनेक चुकीच्या धारणा निर्माण करून हिंदुत्ववाद व उदारमतवाद यात प्रचंड तेढ निर्माण करते आहे. विचारांचा आगडोंब निर्माण होत आहे. या प्रत्येक विकाराला उत्तर सलोखा व प्रेमाने देऊ शेकतो, असे आवटे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक