शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 24, 2015 00:16 IST

दोडामार्गातील स्थिती : योजनांची पूर्तता हवी

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग  तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाकडे स्वत:ची जमीन नसल्यामुळे त्यांना राहण्याची पक्की घरे नाहीत. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जीवनावश्यक सुविधा नाहीत. रस्ते नाहीत. अशा बिकट परिस्थितीत धनगर समाज जगत आहे. देश स्वतंत्र झाला, तरी धनगर समाज मात्र अजूनही आदिवासी आहे. त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, स्वत:ची घरे कधी मिळणार, हा त्यांच्यापुढील सर्वांत मोठा प्रश्न उभा आहे. सावंतवाडी-दोडामार्ग राज्यमार्गावर सासोलीच्या सड्यावर धनगर वस्ती वसलेली आहे. याठिकाणी या धनगर लोकांच्या पिढ्या गेल्या. तरीही याची घरस्वप्नांची, विजेचे स्वप्न पूर्ण कधी होणार याबद्दल त्यांना कोणतीच शाश्वती नाही. घरावर कौले पडतील का, स्वत:ची जमीन म्हणून पाय ठेवीन काय? स्वत:च्या जमिनीत चार दाणे भाताचे पिकवीन काय, या प्रश्नांनी हा धनगर समाज त्या वळणावरून सतत फिरणाऱ्या मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या गाड्यांकडे डोळे टिपून बसला आहे. आज ६५ वर्षे झाली. एवढे पालकमंत्री, आमदार, खासदार, व्हीआयपी अधिकारी यांची केव्हाच नजर त्या करडाच्या झोपडीवर पडली नाही. गावकरीसुद्धा भेटत नाहीत. कारण संबंधित जमीनदार के व्हा येऊन घर काढायला सांगेल, याची भीती सतत असते. घराची वणवण, अंधकाराचा उजेड केव्हा पडेल, पाण्याची दोन किलोमीटरची पायपीट केव्हा संपेल, हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नांच्या उत्तरांची धनगर समाज वाट पाहत आहे. मोदी सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देणार, असे सांगितले. पण, या धनगर वस्त्यांना अच्छे दिन येतील, असे वाटत नाही. कारण घरासाठी आवश्यक असलेली जमीनच नाही, तर घर कसे बांधणार? यासाठी किती वर्षे जातील, असे अनेक प्रश्न धनगर समाजासमोर उभे आहेत. तालुका धनगर समाजोन्नती मंडळाने या धनगर वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. धनगर समाजाच्या समस्या आमदार, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मंडळाचे अध्यक्ष सखाराम झोरे, भैरू वरक, महेश काळे, चिन्मय पटकारे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संतोष पटकारे, सिद्धेश पटकारे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, विठू बोडेकर, आदी उपस्थित होते. इतर धनगर वस्तींमधील अवस्थाआडाळी धनगर वस्तीत सुमारे ३० कुटुंबे असून, एकूण लोकसंख्या १४० आहे.त्यात २० कुटुंबे भूमिहीन आहेत. ग्रामपंचायतीपासून धनगरवस्तीपर्यंत जायला रस्ता नाही, अशी बिकट अवस्था आहे. घर, जमीन नसल्यामुळे आदिवासींप्रमाणे जीवन जगत आहेत. फुकेरी येथील धनगर कुटुंबांना भर रात्री काही गावकऱ्यांनी मारहाण करून पळवून लावले होते, असे सखाराम झोरे यांनी सांगितले. भेकुर्ली येथील धनगर जंगलात राहतात. निडली, भेकुर्ली तसेच अनेक वस्त्यांमधील धनगर भूमिहीन आहेत. कोलझर येथील धनगर कुटुुंबांना पळवून लावल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजनिवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाच्या तोंडातून शब्द निघतात की, धनगर समाजाने एखादा शब्द दिला की फिरवत नाहीत. प्रामाणिक समाज आहे; परंतु आज या प्रामाणिक समाजातील एखाद्याचे निधन झाल्यास दहन करण्यासाठी साडेतीन हात जागासुद्धा नाही. प्रामाणिकपणाचे हेच बक्षीस आहे काय? पालकमंत्री म्हणतात, माझा मतदारसंघ देशातील श्रीमंत मतदारसंघ बनविणार. धनगर वस्त्यांच्या अशा समस्यांनी मतदारसंघ श्रीमंत बनेल काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांनी धनगर समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्यात.- सखाराम झोरे,धनगर समाजबांधव