शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

धनगर समाज ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 24, 2015 00:16 IST

दोडामार्गातील स्थिती : योजनांची पूर्तता हवी

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग  तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाकडे स्वत:ची जमीन नसल्यामुळे त्यांना राहण्याची पक्की घरे नाहीत. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जीवनावश्यक सुविधा नाहीत. रस्ते नाहीत. अशा बिकट परिस्थितीत धनगर समाज जगत आहे. देश स्वतंत्र झाला, तरी धनगर समाज मात्र अजूनही आदिवासी आहे. त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, स्वत:ची घरे कधी मिळणार, हा त्यांच्यापुढील सर्वांत मोठा प्रश्न उभा आहे. सावंतवाडी-दोडामार्ग राज्यमार्गावर सासोलीच्या सड्यावर धनगर वस्ती वसलेली आहे. याठिकाणी या धनगर लोकांच्या पिढ्या गेल्या. तरीही याची घरस्वप्नांची, विजेचे स्वप्न पूर्ण कधी होणार याबद्दल त्यांना कोणतीच शाश्वती नाही. घरावर कौले पडतील का, स्वत:ची जमीन म्हणून पाय ठेवीन काय? स्वत:च्या जमिनीत चार दाणे भाताचे पिकवीन काय, या प्रश्नांनी हा धनगर समाज त्या वळणावरून सतत फिरणाऱ्या मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या गाड्यांकडे डोळे टिपून बसला आहे. आज ६५ वर्षे झाली. एवढे पालकमंत्री, आमदार, खासदार, व्हीआयपी अधिकारी यांची केव्हाच नजर त्या करडाच्या झोपडीवर पडली नाही. गावकरीसुद्धा भेटत नाहीत. कारण संबंधित जमीनदार के व्हा येऊन घर काढायला सांगेल, याची भीती सतत असते. घराची वणवण, अंधकाराचा उजेड केव्हा पडेल, पाण्याची दोन किलोमीटरची पायपीट केव्हा संपेल, हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नांच्या उत्तरांची धनगर समाज वाट पाहत आहे. मोदी सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देणार, असे सांगितले. पण, या धनगर वस्त्यांना अच्छे दिन येतील, असे वाटत नाही. कारण घरासाठी आवश्यक असलेली जमीनच नाही, तर घर कसे बांधणार? यासाठी किती वर्षे जातील, असे अनेक प्रश्न धनगर समाजासमोर उभे आहेत. तालुका धनगर समाजोन्नती मंडळाने या धनगर वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. धनगर समाजाच्या समस्या आमदार, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मंडळाचे अध्यक्ष सखाराम झोरे, भैरू वरक, महेश काळे, चिन्मय पटकारे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संतोष पटकारे, सिद्धेश पटकारे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, विठू बोडेकर, आदी उपस्थित होते. इतर धनगर वस्तींमधील अवस्थाआडाळी धनगर वस्तीत सुमारे ३० कुटुंबे असून, एकूण लोकसंख्या १४० आहे.त्यात २० कुटुंबे भूमिहीन आहेत. ग्रामपंचायतीपासून धनगरवस्तीपर्यंत जायला रस्ता नाही, अशी बिकट अवस्था आहे. घर, जमीन नसल्यामुळे आदिवासींप्रमाणे जीवन जगत आहेत. फुकेरी येथील धनगर कुटुंबांना भर रात्री काही गावकऱ्यांनी मारहाण करून पळवून लावले होते, असे सखाराम झोरे यांनी सांगितले. भेकुर्ली येथील धनगर जंगलात राहतात. निडली, भेकुर्ली तसेच अनेक वस्त्यांमधील धनगर भूमिहीन आहेत. कोलझर येथील धनगर कुटुुंबांना पळवून लावल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजनिवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाच्या तोंडातून शब्द निघतात की, धनगर समाजाने एखादा शब्द दिला की फिरवत नाहीत. प्रामाणिक समाज आहे; परंतु आज या प्रामाणिक समाजातील एखाद्याचे निधन झाल्यास दहन करण्यासाठी साडेतीन हात जागासुद्धा नाही. प्रामाणिकपणाचे हेच बक्षीस आहे काय? पालकमंत्री म्हणतात, माझा मतदारसंघ देशातील श्रीमंत मतदारसंघ बनविणार. धनगर वस्त्यांच्या अशा समस्यांनी मतदारसंघ श्रीमंत बनेल काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांनी धनगर समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्यात.- सखाराम झोरे,धनगर समाजबांधव