शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

देवगडात दूरध्वनी सेवेचा बोजवारा

By admin | Updated: August 16, 2015 21:53 IST

दूरसंचार विभागाला निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नंदूशेठ घाटे यांचा इशारा

देवगड : अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडा तसेच अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे देवगड तालुक्यातील दूरध्वनी सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. दूरसंचार निगमने याकडे लक्ष घालून तालुक्यातील दूरध्वनी सेवा सुरळीत करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, असे टेलिफोन विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूशेठ घाटे यांनी असे निवेदन दिले आहे. देवगड टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नंदूशेठ घाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पंचायत समितीे सदस्य प्रकाश गुरव, अभय बापट, ग्रामपंचायत सदस्य अभय कुळकर्णी, ढोके, शिवानंद पेडणेकर, रामानंद वाळके, बंटी कदम, विनायक जोईल, सुधीर मांजरेकर, आदी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गापासून ४० किलोमीटर आत असलेल्या देवगड तालुक्यात अधिकारी काम करायला येत नाही. त्यामुळे आॅफिस कामांसाठी व फिल्डवरील कामांसाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून रहावे लागते. साहित्याचा तुटवडा असल्याने इच्छा असूनही कर्मचाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडविता येत नाहीत. याचा फटका कंत्राटी कर्मचाऱ्याला बसतो व ग्राहकांच्या रोषाला त्याला बळी पडावे लागते. कारण ग्रामीण भागातील जनता ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश लोक हे या सेवेपासून दूर होत आहेत. सर्व बाबींमध्ये सामान्य ग्राहकांचा दोष काय? कार्यालयाकडून बिल वेळेवर भरले नाही तर सेवा तत्काळ खंडित करता. मग वेळेवर बिले अदा केल्यानंतर सेवा नियमित व अखंडितपणे देणे कर्तव्य नाही का? या बाबींचा विचार करून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरळीत करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल. (प्रतिनिधी)अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडादेवगड तालुक्यात १९ सबस्टेशनपैकी ७ ठिकाणी लाईनमन आहेत व उरलेल्या १२ ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच सर्व कारभार अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधनही मिळत नाही. तालुक्यातील १९ सबस्टेशनला प्रत्येकी २ याप्रमाणे ३८ बॅटऱ्यांची गरज आहे. पण; बहुतांश ठिकाणी बॅटऱ्या उपलब्ध नसल्याने वीज गेली की, फोन सेवा बंद होते, व त्यावेळी ग्राहकांची गैरसोय होते. देवगड तालुक्यात सी.डी.एम.ए. तरंग सेवा ही फक्त नावालाच कार्यरत आहे, असे दिसते. कारण बहुतांश ठिकाणी ही सेवा बंदच आहे. बंद झाल्यास त्याची दुरुस्तीसुद्धा मुख्य कार्यालयात होत नाही.लाईट गेल्यावर काही वेळेला मोबाईल टॉवरही बंद होतात; पण इतर खासगी सेवा सुरळीतपणे चालू आहेत.