शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

देवगडात दूरध्वनी सेवेचा बोजवारा

By admin | Updated: August 16, 2015 21:53 IST

दूरसंचार विभागाला निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नंदूशेठ घाटे यांचा इशारा

देवगड : अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडा तसेच अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे देवगड तालुक्यातील दूरध्वनी सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. दूरसंचार निगमने याकडे लक्ष घालून तालुक्यातील दूरध्वनी सेवा सुरळीत करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, असे टेलिफोन विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूशेठ घाटे यांनी असे निवेदन दिले आहे. देवगड टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नंदूशेठ घाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पंचायत समितीे सदस्य प्रकाश गुरव, अभय बापट, ग्रामपंचायत सदस्य अभय कुळकर्णी, ढोके, शिवानंद पेडणेकर, रामानंद वाळके, बंटी कदम, विनायक जोईल, सुधीर मांजरेकर, आदी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गापासून ४० किलोमीटर आत असलेल्या देवगड तालुक्यात अधिकारी काम करायला येत नाही. त्यामुळे आॅफिस कामांसाठी व फिल्डवरील कामांसाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून रहावे लागते. साहित्याचा तुटवडा असल्याने इच्छा असूनही कर्मचाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडविता येत नाहीत. याचा फटका कंत्राटी कर्मचाऱ्याला बसतो व ग्राहकांच्या रोषाला त्याला बळी पडावे लागते. कारण ग्रामीण भागातील जनता ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश लोक हे या सेवेपासून दूर होत आहेत. सर्व बाबींमध्ये सामान्य ग्राहकांचा दोष काय? कार्यालयाकडून बिल वेळेवर भरले नाही तर सेवा तत्काळ खंडित करता. मग वेळेवर बिले अदा केल्यानंतर सेवा नियमित व अखंडितपणे देणे कर्तव्य नाही का? या बाबींचा विचार करून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरळीत करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल. (प्रतिनिधी)अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडादेवगड तालुक्यात १९ सबस्टेशनपैकी ७ ठिकाणी लाईनमन आहेत व उरलेल्या १२ ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच सर्व कारभार अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधनही मिळत नाही. तालुक्यातील १९ सबस्टेशनला प्रत्येकी २ याप्रमाणे ३८ बॅटऱ्यांची गरज आहे. पण; बहुतांश ठिकाणी बॅटऱ्या उपलब्ध नसल्याने वीज गेली की, फोन सेवा बंद होते, व त्यावेळी ग्राहकांची गैरसोय होते. देवगड तालुक्यात सी.डी.एम.ए. तरंग सेवा ही फक्त नावालाच कार्यरत आहे, असे दिसते. कारण बहुतांश ठिकाणी ही सेवा बंदच आहे. बंद झाल्यास त्याची दुरुस्तीसुद्धा मुख्य कार्यालयात होत नाही.लाईट गेल्यावर काही वेळेला मोबाईल टॉवरही बंद होतात; पण इतर खासगी सेवा सुरळीतपणे चालू आहेत.