शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभार समाजबांधवांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:38 IST

सिंधुदुर्गनगरी : राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यास आपण कुंभार समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी दिले होते. भाजप सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे लोटली तरी फडणवीस सरकारला या आश्वासनाचा विसर पडला आहे. म्हणूनच शासनाला जाग आणण्यासाठी शुक्रवारी कुंभार समाजा ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आपल्या ...

ठळक मुद्देदिलेल्या आश्वासनांचा शासनाला विसर : कुंभार समाज महासंघ कोकण विभाग कुंभार समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सरकारने आमची घोर निराशाच केली : विलास गुडेकर

सिंधुदुर्गनगरी : राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यास आपण कुंभार समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी दिले होते. भाजप सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे लोटली तरी फडणवीस सरकारला या आश्वासनाचा विसर पडला आहे. म्हणूनच शासनाला जाग आणण्यासाठी शुक्रवारी कुंभार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या कडे सुपूर्द केले.

कुंभार समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय उपाध्यक्ष विलास गुडेकर यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सत्यवान नाटळकर, माजी कार्याध्यक्ष साबा पाटकर, माजी सचिव दिलीप हिंदळेकर, उपाध्यक्ष सुहास गोठणकर, काशीनाथ तेंडोलकर, दिलीप सांगवेकर,- विजय हिंदळेकर, रवी सांगवेकर, चंदू पावसकर, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर उपस्थित होते.

कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात माती कला बोर्ड स्थापन करावे, हा समाज उदर निर्वाहासाठी भटकंती जीवन जगत असल्याने या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा.

सरकारी कुंभार खाणी या समाजाला बहाल करणे, संत शिरोमणी गोरोबा काका यांचे जन्म गाव तेर या गावचा सर्वांगीण विकास करून या गावाला तिर्थ क्षेत्राचा दर्जा दिला जावा, रॉयल्टी रद्द करावी, ५० वर्षावरील निवृत्त कारागिरांना मासिक तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी कुंभार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधून घेतले.सरकारकडून निराशादेशाला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे झाली तरी कुंभार समाज मागासलेपणातून बाहेर आलेला नाही त्यामुळे कुंभार समाजाची अधोगती होत आहे. तसेच पर्यावरणाला जाचक अटी लावण्यात येत आहे. त्यामुळे थोडाफार उपलब्ध असलेला व्यवसाय शासन व प्रशासन हिरावून घेऊ पाहत आहे. या सरकारने आमची घोर निराशाच केली, असा आरोप महासंघ कोकण विभाग उपाध्यक्ष विलास गुडेकर यांनी केला आहे 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार