शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मुंबई - गोवा महामार्गाच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भ्रष्टाचार, नीतेश राणे यांची विधानसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:26 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून त्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी नागपूर येथे विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे.

ठळक मुद्देनीतेश राणे म्हणाले, कणकवली प्रांताधिकाऱ्यांना बडतर्फ कराकणकवलीतील सर्व्हे चुकीच्या पध्दतीने

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून त्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी नागपूर येथे विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे.

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत, त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले असल्याची माहिती नीतेश राणे यांनी दिली. महामार्गाच्या चौपदरीकरणात होत असलेल्या सर्व गैरव्यवहाराची माहिती नीतेश राणे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मांडली.

ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला आमचा कोणताही विरोध नाही.  ते चौपदरीकरण झाले पाहिजे. परंतु या चौपदरीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर भागातील ज्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्यापैकी अनेकांना मोबदलाच दिला गेलेला नाही. 

या भुसंपादनात अधिकाऱ्यांनी इतका घोळ करून ठेवला आहे की, जेवढ्या जमिनीची मोजणी झाली होती, त्यापेक्षा जास्त जमिन संपादित करण्यात आली आहे. ज्यांना नोटीसा दिलेल्या नाहीत, त्या प्रकल्पग्रस्तांकडून पैसे घेऊन नोटीसा दिल्या जात आहेत.

जो पैसे देणार नाही त्याला नोटीस मिळणार नाही अशी कार्यपद्धती अवलंबिली जात आहे.  कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेत केली.

कणकवलीतील सर्व्हे चुकीच्या पध्दतीनेनीतेश राणे म्हणाले, कणकवली प्रांताधिकाऱ्यांची कार्यपद्धती पूर्णत: चुकीची आहे. कणकवली शहरातील भूसंपादनासाठी केलेला सर्व्हे चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्याला त्याच जबाबदार आहेत. कणकवली शहरवासीयांवर फार मोठा अन्याय सुरु आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून द्यावा.

प्रांताधिकाऱ्यांना बडतर्फ करुन त्यांची चौकशी करावी आणि चौपदरीकरणात जमीन, घर, सदनिका व इतर मालमत्ता जाणाऱ्या भूमिपुत्रांना योग्य तो मोबदला द्यावा. तसेच कोकणच्या एकूणच विकासाला शासनाने हातभार लावावा अशी मागणी नागपूर येथील अधिवेशनात केली आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७