शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही ! --  नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:35 IST

लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला  जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देमतदाराला विचारले तर निकाल धक्कादायक आहे.असेच उत्तर येते. विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काही आमदार निश्‍चितपणे निवडून येतील

कणकवली : लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला  जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे. तर कुडाळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला फारच कमी मताधिक्य आहे. तशीच परिस्थिती रत्नागिरीतील काही मतदारसंघात आहे.त्यामुळे  विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काही आमदार निश्‍चितपणे निवडून येतील असा विश्‍वास आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.

      कणकवली येथे शुक्रवारी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. ते पुढे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अडीच लाख मते मिळाली आहेत. कोणाशी युती अथवा आघाडी न करता  मिळालेली ही मते म्हणजे एकप्रकारे मतदारांची पोचपावतीच आहे.आम्ही कुणाशी युती केली नव्हती की कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या.निव्वळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचीच ही मते आहेत.त्यामुळे विजयी कोणी झाले असतील तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्यातील  मतदारांच्या मनातील खासदार नीलेश राणे हेच आहेत . हे स्पष्ट होते. कुठल्याही मतदाराला विचारले तर निकाल धक्कादायक आहे.असेच उत्तर येते. कार्यकर्त्यानी निवडणुकीत जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आताचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची खरी ताकद दिसेल.

         आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली  पूर्वीच्याच जिद्दीने, उमेदीने व उत्साहाने जनतेची विकास कामे करण्यास तत्पर राहू. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह  तसेच मोदी लाट असताना व विरोधकांची युती असताना आम्हाला जी मते मिळाली त्यांची संख्या बघता तो आमचा एकप्रकारे विजयच आहे.

            लोकसभा निवडणुकी अगोदर शिवसेना आणि भाजप पक्षात कुरबुरी होत्या. नाराजीचे नाट्य होते. एकमेकांना त्यांनी जाहीर विरोधही केला होता. परंतु , प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट स्थिती होती. शिवसेना - भाजप युतीचे कार्यकर्ते एकमेकांशी प्रामाणिकपणे वागले. त्यामुळे शिवसेनेचे विनायक  राऊत यांना सावंतवाडीत 29 हजाराचे मताधिक्य मिळू शकले. आता यापुढेही शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी  अशीच मैत्री कायम ठेवून एकमेकांशी प्रामाणिक राहावे.  दुष्मनी ठेवू नये. असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

       

आम्ही लढायला तयार  !

येत्या विधानसभा निवडणुकीत  कणकवली मतदारसंघात सर्वाधिक चुरस असणार आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठीची तयारी करीत आहेत. परंतु, काही असले तरी आमच्या विरोधात मात्र  कणकवलीत सारे विरोधक  एकवटून काम करतील. पण तशाही स्थितीत आमची लढायची तयारी आहे . असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsindhudurgसिंधुदुर्ग