शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही ! --  नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:35 IST

लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला  जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देमतदाराला विचारले तर निकाल धक्कादायक आहे.असेच उत्तर येते. विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काही आमदार निश्‍चितपणे निवडून येतील

कणकवली : लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला  जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे. तर कुडाळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला फारच कमी मताधिक्य आहे. तशीच परिस्थिती रत्नागिरीतील काही मतदारसंघात आहे.त्यामुळे  विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काही आमदार निश्‍चितपणे निवडून येतील असा विश्‍वास आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.

      कणकवली येथे शुक्रवारी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. ते पुढे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अडीच लाख मते मिळाली आहेत. कोणाशी युती अथवा आघाडी न करता  मिळालेली ही मते म्हणजे एकप्रकारे मतदारांची पोचपावतीच आहे.आम्ही कुणाशी युती केली नव्हती की कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या.निव्वळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचीच ही मते आहेत.त्यामुळे विजयी कोणी झाले असतील तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्यातील  मतदारांच्या मनातील खासदार नीलेश राणे हेच आहेत . हे स्पष्ट होते. कुठल्याही मतदाराला विचारले तर निकाल धक्कादायक आहे.असेच उत्तर येते. कार्यकर्त्यानी निवडणुकीत जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आताचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची खरी ताकद दिसेल.

         आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली  पूर्वीच्याच जिद्दीने, उमेदीने व उत्साहाने जनतेची विकास कामे करण्यास तत्पर राहू. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह  तसेच मोदी लाट असताना व विरोधकांची युती असताना आम्हाला जी मते मिळाली त्यांची संख्या बघता तो आमचा एकप्रकारे विजयच आहे.

            लोकसभा निवडणुकी अगोदर शिवसेना आणि भाजप पक्षात कुरबुरी होत्या. नाराजीचे नाट्य होते. एकमेकांना त्यांनी जाहीर विरोधही केला होता. परंतु , प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट स्थिती होती. शिवसेना - भाजप युतीचे कार्यकर्ते एकमेकांशी प्रामाणिकपणे वागले. त्यामुळे शिवसेनेचे विनायक  राऊत यांना सावंतवाडीत 29 हजाराचे मताधिक्य मिळू शकले. आता यापुढेही शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी  अशीच मैत्री कायम ठेवून एकमेकांशी प्रामाणिक राहावे.  दुष्मनी ठेवू नये. असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

       

आम्ही लढायला तयार  !

येत्या विधानसभा निवडणुकीत  कणकवली मतदारसंघात सर्वाधिक चुरस असणार आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठीची तयारी करीत आहेत. परंतु, काही असले तरी आमच्या विरोधात मात्र  कणकवलीत सारे विरोधक  एकवटून काम करतील. पण तशाही स्थितीत आमची लढायची तयारी आहे . असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsindhudurgसिंधुदुर्ग