शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनजमिनी विकण्यास परवानगी, दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:46 IST

कोकणातील वनजमिनी राखीव क्षेत्रातील असल्याने त्यांची विक्री करण्यास बंदी होती. आता मात्र येथील राखीव वनजमिनींची विक्री करता येणार आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला असून याचा कोकणातील सर्व राखीव वनजमीनधारकांना फायदा होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

कुडाळ : कोकणातील वनजमिनी राखीव क्षेत्रातील असल्याने त्यांची विक्री करण्यास बंदी होती. आता मात्र येथील राखीव वनजमिनींची विक्री करता येणार आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला असून याचा कोकणातील सर्व राखीव वनजमीनधारकांना फायदा होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाबरोबर येथील अंतर्गत रस्तेही दोन वर्षांत सुसज्ज करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ८०० कोटी निधीची तरतूद केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, पंचायत समिती सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, प्रकाश परब, नगरसेवक सचिन काळप, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. येथील अंतर्गत मुख्य रस्तेही सुस्थितीत आणण्यासाठी गेल्यावर्षीपासूनच कामांना सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेतून सन २०१७-१८ या वर्षात ११४ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली आहे. तर २०१८-१९ मध्ये २१५ किलोमीटरच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामांना सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कणकवली-आचरा आणि कसाल-मालवण या रस्त्यांसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संकेश्वर-रेडी, वेंगुर्ले-दाणोली, वैभववाडी रस्त्यांसह जिल्ह्यात येणा-या बेळगाव, कोल्हापूर या रस्त्यांच्या कामांसाठीही लवकरच निधी मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वेंगुर्ले-दाणोली या रस्त्यावर काही प्रमाणात दुकाने व इतर स्थावर मालमत्ता असल्याने जमीन अधिग्रहण प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाची निविदा निघाली नाही. येथील ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास याही कामाची निविदा निघून रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पुन्हा नव्याने २ लाख झाडे त्या त्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून वनविभागामार्फत लावण्यात येणार आहेत. ही सर्व फळझाडे असणार असून शासनाकडूनही काही झाडे उपलब्ध होणार आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. कोकणात मोठ्या प्रमाणात राखीव वनक्षेत्र असल्याने येथील जमीनमालकांना जमिनींची विक्री करता येत नव्हती. जिल्ह्यात सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रात ही अडचण होती. मात्र शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार या जमिनी विकता येणार असल्याने रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक भूधारकांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र या जमिनीत केवळ वनशेतीच करता येणार आहे. ओखी वादळाने झालेल्या काजू तसेच आंबा पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. एमआरजीएसची लागवड खासगी क्षेत्रात व्हावी : वैभव नाईक सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील महामार्ग चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच इतर मालमत्ता जात आहे. संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.   यापुढे रस्त्यांच्या कामांसाठी आता पोटठेकेदार नेमता येणार नाही. शासनाने पोटठेकेदार नेमण्यास बंदी घातली आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व चांगली होऊन दोन वर्षांत जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत येण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न आहेत, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.शासनाच्यावतीने एमआरजीएस योजनेखाली राबविण्यात येणा-या लागवड योजनेचा लाभ खासगी भूधारकांनाही देण्यात यावा. जेणेकरून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वृक्षलागवड होईल, अशी मागणी विधानसभेत केल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर