शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनजमिनी विकण्यास परवानगी, दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:46 IST

कोकणातील वनजमिनी राखीव क्षेत्रातील असल्याने त्यांची विक्री करण्यास बंदी होती. आता मात्र येथील राखीव वनजमिनींची विक्री करता येणार आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला असून याचा कोकणातील सर्व राखीव वनजमीनधारकांना फायदा होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

कुडाळ : कोकणातील वनजमिनी राखीव क्षेत्रातील असल्याने त्यांची विक्री करण्यास बंदी होती. आता मात्र येथील राखीव वनजमिनींची विक्री करता येणार आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला असून याचा कोकणातील सर्व राखीव वनजमीनधारकांना फायदा होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाबरोबर येथील अंतर्गत रस्तेही दोन वर्षांत सुसज्ज करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ८०० कोटी निधीची तरतूद केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, पंचायत समिती सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, प्रकाश परब, नगरसेवक सचिन काळप, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. येथील अंतर्गत मुख्य रस्तेही सुस्थितीत आणण्यासाठी गेल्यावर्षीपासूनच कामांना सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेतून सन २०१७-१८ या वर्षात ११४ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली आहे. तर २०१८-१९ मध्ये २१५ किलोमीटरच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामांना सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कणकवली-आचरा आणि कसाल-मालवण या रस्त्यांसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संकेश्वर-रेडी, वेंगुर्ले-दाणोली, वैभववाडी रस्त्यांसह जिल्ह्यात येणा-या बेळगाव, कोल्हापूर या रस्त्यांच्या कामांसाठीही लवकरच निधी मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वेंगुर्ले-दाणोली या रस्त्यावर काही प्रमाणात दुकाने व इतर स्थावर मालमत्ता असल्याने जमीन अधिग्रहण प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाची निविदा निघाली नाही. येथील ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास याही कामाची निविदा निघून रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पुन्हा नव्याने २ लाख झाडे त्या त्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून वनविभागामार्फत लावण्यात येणार आहेत. ही सर्व फळझाडे असणार असून शासनाकडूनही काही झाडे उपलब्ध होणार आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. कोकणात मोठ्या प्रमाणात राखीव वनक्षेत्र असल्याने येथील जमीनमालकांना जमिनींची विक्री करता येत नव्हती. जिल्ह्यात सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रात ही अडचण होती. मात्र शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार या जमिनी विकता येणार असल्याने रत्नागिरी, सिंंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक भूधारकांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र या जमिनीत केवळ वनशेतीच करता येणार आहे. ओखी वादळाने झालेल्या काजू तसेच आंबा पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. एमआरजीएसची लागवड खासगी क्षेत्रात व्हावी : वैभव नाईक सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील महामार्ग चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच इतर मालमत्ता जात आहे. संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.   यापुढे रस्त्यांच्या कामांसाठी आता पोटठेकेदार नेमता येणार नाही. शासनाने पोटठेकेदार नेमण्यास बंदी घातली आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व चांगली होऊन दोन वर्षांत जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत येण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न आहेत, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.शासनाच्यावतीने एमआरजीएस योजनेखाली राबविण्यात येणा-या लागवड योजनेचा लाभ खासगी भूधारकांनाही देण्यात यावा. जेणेकरून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वृक्षलागवड होईल, अशी मागणी विधानसभेत केल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर