शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

By admin | Updated: July 2, 2017 17:01 IST

कृषि दिन साजरा : बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0२ : भात लागवडीच्या सरासरी उत्पादनामध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम असून काही शेतकऱ्यांनी १३४ क्विंटलपर्यंत भात उत्पादन घेतले आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात सरासरी ३२ क्विंटल एवढेच भात उत्पादन घेतले जाते. ही भात उत्पादनाची सरासरी १0 क्विंटलवर नेवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतो असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिन व शेतकरी मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी शिवाजीराव शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, कृषि विकास अधिकारी एस. एम. म्हेत्रे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उद्यानविद्या महाविद्यालयातीचे प्राचार्य व कर्मचारी, शेतकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. केसरकर म्हणाले की, शेतकरी आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी तयार करण्यात आलेल्या अद्यावत यंत्रणांचा वापर करणे गरजेचे आहे. या जिल्ह्याचे भात पीक हे प्रमुख पीक असून भात हे मुख्य अन्न आहे. अलीकडे एस. आर. आय पध्दत विकसित झाली असून यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येत आहे. याचा वापर शेतक-यांनी करावा. त्यासाठी त्यांना आवश्यक उपकरणे आपण चांदा ते बांदा योजनेखाली देण्याचे नियोजन केले आहे. एस.आर. आय भात लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी अनुदानाच्या रुपाने शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिले. जेणेकरुन शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.कोकम, जांभूळ आणि करवंदाची झाडे लावण्?यात यावी. नारळापासून निरा उत्पादन करण्यामध्ये खूप फायदा आहे. तरी शेतकऱ्यांनी निरा उत्पादन करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजना समजून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. कुडाळ पंचायत समितीच्या वतीने २0१६-१७ खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक उत्पादन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या शेतकरी सुषमा सावंत, सुरेश खरजुवेकर, अकुश परब यांचा शाल श्रीफळ व प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच बॉयोगॅस निर्मिती मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.