शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

By admin | Updated: July 2, 2017 17:01 IST

कृषि दिन साजरा : बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0२ : भात लागवडीच्या सरासरी उत्पादनामध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम असून काही शेतकऱ्यांनी १३४ क्विंटलपर्यंत भात उत्पादन घेतले आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात सरासरी ३२ क्विंटल एवढेच भात उत्पादन घेतले जाते. ही भात उत्पादनाची सरासरी १0 क्विंटलवर नेवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतो असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिन व शेतकरी मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी शिवाजीराव शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, कृषि विकास अधिकारी एस. एम. म्हेत्रे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उद्यानविद्या महाविद्यालयातीचे प्राचार्य व कर्मचारी, शेतकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. केसरकर म्हणाले की, शेतकरी आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी तयार करण्यात आलेल्या अद्यावत यंत्रणांचा वापर करणे गरजेचे आहे. या जिल्ह्याचे भात पीक हे प्रमुख पीक असून भात हे मुख्य अन्न आहे. अलीकडे एस. आर. आय पध्दत विकसित झाली असून यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येत आहे. याचा वापर शेतक-यांनी करावा. त्यासाठी त्यांना आवश्यक उपकरणे आपण चांदा ते बांदा योजनेखाली देण्याचे नियोजन केले आहे. एस.आर. आय भात लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी अनुदानाच्या रुपाने शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिले. जेणेकरुन शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.कोकम, जांभूळ आणि करवंदाची झाडे लावण्?यात यावी. नारळापासून निरा उत्पादन करण्यामध्ये खूप फायदा आहे. तरी शेतकऱ्यांनी निरा उत्पादन करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजना समजून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. कुडाळ पंचायत समितीच्या वतीने २0१६-१७ खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक उत्पादन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या शेतकरी सुषमा सावंत, सुरेश खरजुवेकर, अकुश परब यांचा शाल श्रीफळ व प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच बॉयोगॅस निर्मिती मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.