शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"भाजपाचे मंत्री ठाण मांडून बसतात, मग शिवसेनेचे का बसले नाहीत?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:56 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका अनारोजीन लोबो,गोविंद वाडकर, प्रतिक बांदेकर, विशाल सावंत आदि उपस्थीत होते.

केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जरी आमचा पराभव झाला असला तरी त्याना पडलेली मते 2811 आहेत तर आम्हाला पडलेली मते ही 2917 एवढी आहेत त्यानी हे सर्व अभ्यासावे जरी हा विजय झाला असला तरी या धनशक्ती चा आहे मात्र आता यापुढे माझा लढा धनशक्ती विरोधात असून सावंतवाडीत जेव्हा एका हाॅटेल च्या समोर जास्त गाड्या उभ्या होत्या तेव्हा मी पोलीसाना माहिती दिली पण पोलीसांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत मी याची गंभीर दखल घेतल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचा मोठा पराभव होणार हे जेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना राणे याच्या दिमतीला पाठवले पण आमच्या कडून तसे झाले नाही एक दोन मंत्री येथे ठाण मांडून बसले पाहिजे होते असे यावेळी केसरकर यानी सांगत खत व्यक्त केली.तसेच आगामी निवडणुकीत मी ठाण मांडून बसणार असल्याचे सांगितले.तसेच माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत याचा पराभव झाला असला तरी त्याना आता कोणते ही मोठे पद देणे गरजेचे असून त्यानी चांगली लढत दिली हे विसरून चालणार नाही त्याच्या मतदार संघात केंद्रिय मंत्री ठाण मांडून होते पैसे मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला असा आरोप ही केसरकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग