शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डी.एड., बी.एड. धारकांचे साखळी उपोषण, सिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 16:40 IST

आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे साखळी उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देडी.एड., बी.एड. धारकांचे साखळी उपोषणसिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनेचे आंदोलन  शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७0 टक्के आरक्षण देण्याची प्रमुख मागणी

सिंधुुदुर्गनगरी : आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे साखळी उपोषण सुरु केले आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड., बी.एड. धारक संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील डीएड, बीएडधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.

यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, लवू खरवत, भाग्यश्री नर, गणपत दांडी यांच्यासह शेकडो डीएड, बीएड धारक उपस्थित होते. सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हे आहेत. येथील तरुण तरुणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, जमिनी विकून आपले डीएड, बीएड शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, या सर्वांना आज अन्य रोजगारावर आपले पोट भरावे लागत आहे.

शासनाने गेली आठ वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया राबविली नसल्याने राज्यातील लाखो डी.एड, बीएड धारक बेरोजगार आहेत. केवळ नावालाच शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) राबविली जात असल्याचा आरोपही या संघटनेने केला आहे.

पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळेच नाराज झालेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत एप्रिल महिन्यात भव्य मोर्चा काढला होता. तरीही शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणूनच आंदोलनाची पुढील दिशा म्हणून या डीएड, बीएड धारकांनी सोमवार १४ ते १६ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.त्याचप्रमाणे शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण न दिल्यास परजिल्ह्यातील एकाही उमेदवारला जिल्ह्यात रूजू करून घेतले जाणार नसल्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या डीएड, बीएड धारकांनी यावेळी विविध गीते व भजने सादर केली. या गीत गायनामधूनही शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

...या आहेत प्रमुख मागण्याआंतरजिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड बीएड धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे डोंगराळ भागात असल्याने या जिल्ह्यात डोंगरी भाग निकषातून आरक्षण मिळावे, सन २०१० सारखे विदर्भ-मराठवाड्यामधील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करू नये, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक