शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सावंतवाडी-दोडामार्ग ‘इको सेन्सिटिव्ह’ जाहीर करा, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:21 IST

मुंबई : सावंतवाडी -दोडामार्ग पर्यावरणीयदृष्टीने किती महत्त्वाचा आहे, याचे वैज्ञानिक पुरावे असून हा भाग महत्त्वाचा आहे, यावर राज्य सरकार ...

मुंबई : सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीयदृष्टीने किती महत्त्वाचा आहे, याचे वैज्ञानिक पुरावे असून हा भाग महत्त्वाचा आहे, यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे एकमत असले तरी सावंतवाडी-दोडामार्ग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील भाग’ असल्याची अधिसूचना काढण्यासाठी ११ वर्षांचा विलंब करण्यात आला, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आणखी विलंब न करता राज्य सरकारने हा भाग पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यासाठी चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा आणि केंद्र सरकारने सहा महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरदरम्यान २५ गावे येतात. या मार्गिकेतून अनेक वन्यप्राणी ये-जा करत असल्याचे आढळले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आहेत. हा भाग पर्यावरणीयदृष्टीने अत्यंत संवेदनशील असूनही येथे दोन वर्षांत ६३९.६२ हेक्टर जमिनीवर जंगलतोड करण्यात आली. ही चिंतेची बाब आहे. अशाच प्रकारे जंगलतोड होत राहिली आणि माणसांचा वावर वाढत गेला तर, हा कॉरिडॉर नष्ट होईल, असे निरीक्षण न्या. नितीन जामदार व न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने नोंदविले. या भागातील जंगलतोडीवर न्यायालयाने २०१३ मध्ये स्थगिती दिली होती. केंद्र सरकार अंतिम अधिसूचना काढेपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

झाडे तोडण्यास आळा बसावा यासाठी न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश सावंतवाडीचे जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक सावंतवाडी आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच या टास्क फोर्सकडे पर्यावरणाला हानी पोहोचविल्यास व झाडे तोडल्यास तक्रार करता येईल. या टास्क फोर्सचा ई-मेल, सोशल मीडिया, टेलिफोन नंबरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण करण्यात न आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘२०१३ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे आदेश न करून केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरले आहेत’, अशा शब्दांत न्यायालयाने दोन्ही सरकारला फटकारले.

राज्य सरकारने निवडणूक व आचारसंहितेचे कारण पुढे केल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांत सावंतवाडी -दोडामार्ग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ असल्याचे जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले, तर केंद्र सरकारला या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी दोन महिने आणि प्रत्यक्षात अधिसूचना काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चार महिन्यांत अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीHigh Courtउच्च न्यायालय