शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी

By सुधीर राणे | Updated: November 25, 2022 15:42 IST

जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी

कणकवली: हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ यासह अनेक समस्येमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. येत्या अधिवेशनात सरकारने गांभीर्याने मच्छीमारांच्या समस्यांचे निराकरण करुन ‘मत्स्यदुष्काळ' घोषित करावा. तसेच आर्थिक सहकार्य घोषित करावे, अशी मागणी जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघ यांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१६ ते आज मितीस तालुक्यातील सगळे रापण संघ 'मत्स्यदुष्काळाच्या' खाईत लोटले गेले आहेत. रापण व्यवसायावर अवलंबित सदस्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरु आहे. मागील सरकारने आपत्कालीनदृष्टीने थोडीफार मदत केली. पण ३ वर्षात किनारपट्टीवर खांडवी मासळी येत नाही. हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ, परराज्यातील नौकांकडून होत असलेली मासळीची लुट व त्यातच हायस्पीड परप्रांतीय यामुळे मासेमारीच्या ऐन हंगामात थव्यांची मासळी येणे किनारपट्टीवर दुरापास्त झाले आहे.परिणामी रापण व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही 'आत्महत्ये'चा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने सद्यस्थिती माहिती घेऊन अहवाल बनवावा तसेच 'मत्स्यदुष्काळजन्य' स्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFishermanमच्छीमार