शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:45 IST

गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे.

देवगड - गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प हा येथील आंबा कलमांना व माणसांनादेखील घातक ठरणारा आहे. यामुळे अशा प्रकल्पाला कोकणामध्ये आश्रय देता कामा नये. यासाठी येथील जनतेने एकत्रित येत संघर्ष करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पासारखा हा प्रकल्पही हद्दपार केला पाहिजे, असे मत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले.

गिर्ये-रामेश्वर येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात रामेश्वर मंदिर येथे शनिवारी मेळावा झाला. यावेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, योगेश नाटेकर, रामेश्वर सरपंच नलिनी गिरकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, रामेश्वर-गिर्ये प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकूर, पंढरीनाथ आंबेरकर, वसंत बांदकर, नंदकुमार कुलकर्णी, अमित भाटकर, राजेंद्र कातारकर, विक्रांत कर्णिक, भाई सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक वालम म्हणाले की, या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष करताना कोणालाही घाबरुन आपण घरी बसता कामा नये. राजकीय नेते व या प्रकल्पामध्ये स्वार्थ साधून आपली  आर्थिक उन्नती साधणारे नेते हे हा प्रकल्प होण्यासाठी खोटे बोलून तुमची दिशाभूल करतील. या त्यांच्या आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका. संघर्ष करण्यासाठी तुमच्यासोबत मी आहे. आपला प्राण गेला तरी चालेल, पण या ठिकाणी कोकणच्या सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प उभारला जाता कामा नये, असे ते म्हणाले.

शासनकर्त्यांचे प्रकल्प लादण्याचे कामयावेळी विक्रांत कर्णिक म्हणाले की, शासन असे पर्यावरणाचे ºहास करणारे प्रकल्प उभारीत असताना या प्रकल्पाची परिपूर्ण माहिती कधीही शेतकºयांना देत नाही. येथील भू धारकांना अंधारात ठेवूनच प्रकल्प लादण्याचे काम शासनाने वेळोवेळी केले आहे. यामुळे आपण संघटित राहून असे प्रकल्प होऊ देता कामा नये, असेही ते म्हणाले.

आमिषाला बळी पडू नकावडिलोपार्जित असलेली आपली या ठिकाणची जमीन, या ठिकाणची देवस्थाने सोडून आपण कोठेही जाऊ शकत नाही. आपली या मातीशी नाळ जोडलेली आहे. या कोकणच्या मातीने आपणाला आर्थिक बळ दिले आहे. या जन्मभूमीला आपण विसरु शकत नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ज्वलंत असली पाहिजे. येथील एजंट हे आपणाला पैसे मिळण्यासाठी तुमच्या जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करतील. पण त्यांच्या या आमिषाला बळी पडता कामा नये, असे मतही वालम यांनी व्यक्त केले.