शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:45 IST

गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे.

देवगड - गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प हा येथील आंबा कलमांना व माणसांनादेखील घातक ठरणारा आहे. यामुळे अशा प्रकल्पाला कोकणामध्ये आश्रय देता कामा नये. यासाठी येथील जनतेने एकत्रित येत संघर्ष करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पासारखा हा प्रकल्पही हद्दपार केला पाहिजे, असे मत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले.

गिर्ये-रामेश्वर येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात रामेश्वर मंदिर येथे शनिवारी मेळावा झाला. यावेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, योगेश नाटेकर, रामेश्वर सरपंच नलिनी गिरकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, रामेश्वर-गिर्ये प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकूर, पंढरीनाथ आंबेरकर, वसंत बांदकर, नंदकुमार कुलकर्णी, अमित भाटकर, राजेंद्र कातारकर, विक्रांत कर्णिक, भाई सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक वालम म्हणाले की, या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष करताना कोणालाही घाबरुन आपण घरी बसता कामा नये. राजकीय नेते व या प्रकल्पामध्ये स्वार्थ साधून आपली  आर्थिक उन्नती साधणारे नेते हे हा प्रकल्प होण्यासाठी खोटे बोलून तुमची दिशाभूल करतील. या त्यांच्या आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका. संघर्ष करण्यासाठी तुमच्यासोबत मी आहे. आपला प्राण गेला तरी चालेल, पण या ठिकाणी कोकणच्या सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प उभारला जाता कामा नये, असे ते म्हणाले.

शासनकर्त्यांचे प्रकल्प लादण्याचे कामयावेळी विक्रांत कर्णिक म्हणाले की, शासन असे पर्यावरणाचे ºहास करणारे प्रकल्प उभारीत असताना या प्रकल्पाची परिपूर्ण माहिती कधीही शेतकºयांना देत नाही. येथील भू धारकांना अंधारात ठेवूनच प्रकल्प लादण्याचे काम शासनाने वेळोवेळी केले आहे. यामुळे आपण संघटित राहून असे प्रकल्प होऊ देता कामा नये, असेही ते म्हणाले.

आमिषाला बळी पडू नकावडिलोपार्जित असलेली आपली या ठिकाणची जमीन, या ठिकाणची देवस्थाने सोडून आपण कोठेही जाऊ शकत नाही. आपली या मातीशी नाळ जोडलेली आहे. या कोकणच्या मातीने आपणाला आर्थिक बळ दिले आहे. या जन्मभूमीला आपण विसरु शकत नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ज्वलंत असली पाहिजे. येथील एजंट हे आपणाला पैसे मिळण्यासाठी तुमच्या जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करतील. पण त्यांच्या या आमिषाला बळी पडता कामा नये, असे मतही वालम यांनी व्यक्त केले.