शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:45 IST

गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे.

देवगड - गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प हा येथील आंबा कलमांना व माणसांनादेखील घातक ठरणारा आहे. यामुळे अशा प्रकल्पाला कोकणामध्ये आश्रय देता कामा नये. यासाठी येथील जनतेने एकत्रित येत संघर्ष करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पासारखा हा प्रकल्पही हद्दपार केला पाहिजे, असे मत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले.

गिर्ये-रामेश्वर येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात रामेश्वर मंदिर येथे शनिवारी मेळावा झाला. यावेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, योगेश नाटेकर, रामेश्वर सरपंच नलिनी गिरकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, रामेश्वर-गिर्ये प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकूर, पंढरीनाथ आंबेरकर, वसंत बांदकर, नंदकुमार कुलकर्णी, अमित भाटकर, राजेंद्र कातारकर, विक्रांत कर्णिक, भाई सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक वालम म्हणाले की, या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष करताना कोणालाही घाबरुन आपण घरी बसता कामा नये. राजकीय नेते व या प्रकल्पामध्ये स्वार्थ साधून आपली  आर्थिक उन्नती साधणारे नेते हे हा प्रकल्प होण्यासाठी खोटे बोलून तुमची दिशाभूल करतील. या त्यांच्या आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका. संघर्ष करण्यासाठी तुमच्यासोबत मी आहे. आपला प्राण गेला तरी चालेल, पण या ठिकाणी कोकणच्या सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प उभारला जाता कामा नये, असे ते म्हणाले.

शासनकर्त्यांचे प्रकल्प लादण्याचे कामयावेळी विक्रांत कर्णिक म्हणाले की, शासन असे पर्यावरणाचे ºहास करणारे प्रकल्प उभारीत असताना या प्रकल्पाची परिपूर्ण माहिती कधीही शेतकºयांना देत नाही. येथील भू धारकांना अंधारात ठेवूनच प्रकल्प लादण्याचे काम शासनाने वेळोवेळी केले आहे. यामुळे आपण संघटित राहून असे प्रकल्प होऊ देता कामा नये, असेही ते म्हणाले.

आमिषाला बळी पडू नकावडिलोपार्जित असलेली आपली या ठिकाणची जमीन, या ठिकाणची देवस्थाने सोडून आपण कोठेही जाऊ शकत नाही. आपली या मातीशी नाळ जोडलेली आहे. या कोकणच्या मातीने आपणाला आर्थिक बळ दिले आहे. या जन्मभूमीला आपण विसरु शकत नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ज्वलंत असली पाहिजे. येथील एजंट हे आपणाला पैसे मिळण्यासाठी तुमच्या जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करतील. पण त्यांच्या या आमिषाला बळी पडता कामा नये, असे मतही वालम यांनी व्यक्त केले.