शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

चांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:56 IST

सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली. या योजनेत खर्च न झालेला निधी शासनाने परत मागविला नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देचांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णयउपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई/सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली. या योजनेत खर्च न झालेला निधी शासनाने परत मागविला नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, नागोराव गाणार, प्रसाद लाड, परिणय फुके यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा मांडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी उपलब्ध असतानाही, या योजनेतून एकही प्रकल्प राबविला गेला नाही. तर ९ जानेवारी २०२० मध्ये निधी अखर्चित राहिल्यामुळे तो शासनाला समर्पित केला जात आहे का, याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये ४९ कोटी, २०१७-१८ मध्ये ६७ कोटी, २०१८-१९ मध्ये ७२ कोटी ५७ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करण्यात आले. त्यानुसार कृषी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात राबविलेल्या योजनेचा ३ हजार ४५८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला होता.

या योजनेला ३१ मार्च २०२० पर्यंत मान्यता देण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत झालेल्या कामाची सद्यस्थिती व झालेला खर्च आदींबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अखर्चित निधी शासनाला परत पाठविण्याबाबत कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्गाच्या विकासावर विपरित परिणाम : डावखरेचांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक विकासात्मक कामे झालेले आहे अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना बंद केल्यास सिंधुदुर्गामधील विकासकामांवर विपरित परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गVidhan Parishadविधान परिषद