शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 14:07 IST

मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो.

सावंतवाडी : मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो. आता सामाजिक कार्यात कार्यरत असणार आहे. खाकी अंगावर आल्याने मला जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या ३३ वर्षाच्या सेवेत अनेकांना न्याय देऊ शकलो हे माझे मी भाग्य समजतो, असे मत सावंतवाडीचे मावळते पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा माझ्या बालपणीच्या मित्रांसमवेत साजरा होतो याच्यासारखा आनंद कुठला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, कुडाळ पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उद्योजक राजन आंगणे, नगरसेवक उदय नाईक, बाबा नाईक, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रा. सुभाष गोवेकर, माजी कृषी अधिकारी काका परब, बाळ बोर्डेकर, बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पोलीस निरीक्षक विनित चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दयानंद गवस यांनी अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. त्याची पोचपावती त्यांच्या पुढील आयुष्यात मिळेल. त्यांनी आपण स्थानिक असलो तरी कुणावरही अन्याय करणार नाही ही भावना कायम ठेवून काम केले. त्यामुळेच ते यशस्वी अधिकारी होऊ शकले, असे मत यावेळी त्यांनी मांडले. त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात राजकारणात यावे आणि काम करावे, असे आवाहनही साळगावकर यांनी यावेळी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सेवानिवृत्ती ही खरोखरच अवघड असते. पण जी व्यक्ती नेहमी समाजासोबत काम करत असते, त्या व्यक्तीला कधीही याची उणीव भासत नाही. आता यापुढे गवस यांनीही समाजकारण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी काम करावे, असे मत मांडले.पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे चांगलेच भावूक झाले होते. मी ३३ वर्षांपूर्वी सेवेत आलो, पण कधीही पोलीस सेवा वाईट म्हटली नाही. जे चांगले असेल ते स्वीकारत गेलो आणि काम केले. त्यामुळेच मला माझ्या बालपणीचे मित्रही सेवा निवृत्तीच्या काळात मिळाले, असे सांगत मुंबईत सेवा बजावत असताना अनेक प्रसंग आले. मुंबई कोणासाठी थांबत नाही हे आम्ही अनुभवले आणि हे अनुभवण्याचे भाग्यच पोलीस सेवेमुळे मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुंबई बॉम्बस्फोट तसेच १९९२ ची मुंबई दंगल आदी घटना मला पाहण्यास मिळाल्या हे मी माझे भाग्य समजतो. वाहतूक पोलीस म्हणूनही चांगले काम केले. माझ्यावर वाहतुकीबाबत अभ्यास करण्याची खास जबाबदारी सध्याचे पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिली होती आणि ते काम मी योग्य पध्दतीने केले असल्याचे गवस यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. आता यापुढे फक्त माझी नोकरी बदलली. आता सामाजकारण ही माझी नोकरी असणार आहे. माणसाने कधीही शांत बसता नये. नेहमी काम करत रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस व नाईक यांनी पोलीस उपअधीक्षक गवस यांचा सत्कार केला. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल माया पवार यांनी यांच्या पत्नीचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, माजी कृषी अधिकारी काका परब, जगदीश मांजरेकर, सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी, आभार अभय वाखारे यांनी मांडले.