शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 14:07 IST

मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो.

सावंतवाडी : मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो. आता सामाजिक कार्यात कार्यरत असणार आहे. खाकी अंगावर आल्याने मला जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या ३३ वर्षाच्या सेवेत अनेकांना न्याय देऊ शकलो हे माझे मी भाग्य समजतो, असे मत सावंतवाडीचे मावळते पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा माझ्या बालपणीच्या मित्रांसमवेत साजरा होतो याच्यासारखा आनंद कुठला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, कुडाळ पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उद्योजक राजन आंगणे, नगरसेवक उदय नाईक, बाबा नाईक, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रा. सुभाष गोवेकर, माजी कृषी अधिकारी काका परब, बाळ बोर्डेकर, बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पोलीस निरीक्षक विनित चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दयानंद गवस यांनी अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. त्याची पोचपावती त्यांच्या पुढील आयुष्यात मिळेल. त्यांनी आपण स्थानिक असलो तरी कुणावरही अन्याय करणार नाही ही भावना कायम ठेवून काम केले. त्यामुळेच ते यशस्वी अधिकारी होऊ शकले, असे मत यावेळी त्यांनी मांडले. त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात राजकारणात यावे आणि काम करावे, असे आवाहनही साळगावकर यांनी यावेळी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सेवानिवृत्ती ही खरोखरच अवघड असते. पण जी व्यक्ती नेहमी समाजासोबत काम करत असते, त्या व्यक्तीला कधीही याची उणीव भासत नाही. आता यापुढे गवस यांनीही समाजकारण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी काम करावे, असे मत मांडले.पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे चांगलेच भावूक झाले होते. मी ३३ वर्षांपूर्वी सेवेत आलो, पण कधीही पोलीस सेवा वाईट म्हटली नाही. जे चांगले असेल ते स्वीकारत गेलो आणि काम केले. त्यामुळेच मला माझ्या बालपणीचे मित्रही सेवा निवृत्तीच्या काळात मिळाले, असे सांगत मुंबईत सेवा बजावत असताना अनेक प्रसंग आले. मुंबई कोणासाठी थांबत नाही हे आम्ही अनुभवले आणि हे अनुभवण्याचे भाग्यच पोलीस सेवेमुळे मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुंबई बॉम्बस्फोट तसेच १९९२ ची मुंबई दंगल आदी घटना मला पाहण्यास मिळाल्या हे मी माझे भाग्य समजतो. वाहतूक पोलीस म्हणूनही चांगले काम केले. माझ्यावर वाहतुकीबाबत अभ्यास करण्याची खास जबाबदारी सध्याचे पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिली होती आणि ते काम मी योग्य पध्दतीने केले असल्याचे गवस यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. आता यापुढे फक्त माझी नोकरी बदलली. आता सामाजकारण ही माझी नोकरी असणार आहे. माणसाने कधीही शांत बसता नये. नेहमी काम करत रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस व नाईक यांनी पोलीस उपअधीक्षक गवस यांचा सत्कार केला. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल माया पवार यांनी यांच्या पत्नीचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, माजी कृषी अधिकारी काका परब, जगदीश मांजरेकर, सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी, आभार अभय वाखारे यांनी मांडले.