शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव, उभादांडा येथील वुड हाऊसचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:02 IST

पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाने उभादांडा सागरेश्वर किनारी उभारलेले वुड हाऊस, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, पदपथ, गॅझिबो यांचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव, उभादांडा येथील वुड हाऊसचे नुकसान शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा वेंगुर्ला भाजपाचा आरोप

वेंगुर्ला : पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाने उभादांडा सागरेश्वर किनारी उभारलेले वुड हाऊस, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, पदपथ, गॅझिबो यांचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यातील स्वच्छतागृह आणि चेंजिंग रुम पूर्णपणे कलंडले असून चुकीच्या पद्धतीने उभारणी केल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तांत्रिक सहाय्यक अधिकारी पृथ्वीराज जाधव यांना सागरेश्वर येथे भेट घेऊन घेराव घालण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाबा नाईक, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, युवामोर्चाचे संदीप पाटील, समीर चिंदरकर, नितीश कुडतरकर, दादा तांडेल, कमलाकांत प्रभू, विद्याधर धानजी, जगन्नाथ राणे, शेखर काणेकर, दशरथ गडेकर, पुंडलिक हळदणकर, निलय नाईक, राहुल मोर्डेकर, प्रकाश मोटे, प्रथमेश यंदे, सोनू सावंत आदी उपस्थित होते.या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या ओरोस येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.सध्या एमटीडीसीने समुद्रकिनारी जेथे वुड हाऊस उभारले आहेत त्या जागी पूर्वी सुरुची झाडे होती. ती झाडे समुद्री उधाणाने उन्मळून पडून ती जागा सपाट झालेली होती. त्यामुळे शेजारीच असलेल्या ग्रामस्थांना समुद्राच्या उधाणाचा त्रास होत होता. ग्रामस्थांची सातत्याने धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होती. परंतु त्यांच्या मागणीस केराची टोपली दाखवून पर्यटन विकास महामंडळाने हा पर्यटन प्रकल्प उभा केला होता.यापूर्वीही पर्यटन महामंडळाने तंबूनिवास प्रकल्प सागरेश्वरच्या सुरुच्या बनात उभारला होता. त्यावेळीसुद्धा हा प्रकल्प खासगी जमिनीत उभारल्यामुळे जागा मालकाने त्याच्यावर ताबा सांगून ते तंबू आपल्या ताब्यात घेतल्यामुळे तो प्रकल्प बंद झाला. त्यावेळीही दोन कोटीेंचा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गुंडाळावा लागला. त्यामुळे शासकीय निधीची लूटमार होत असल्याचा आरोप करण्यात आला.विरोधी पक्षनेत्यांमार्फत अधिवेशनात आवाज उठविणारठेकेदार व अधिकारी यांच्यात साटेलोट असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या जागेचे तांत्रिक सर्वेक्षण करणारी कंपनी स्ट्रकवेल इंजिनिअरिंग, मुंबई हीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. त्या कंपनीने जागेचा सर्व्हे, डिझाईन देण्याचे काम केले आहे. कामाचे ठेकेदार गुप्ता कन्स्ट्रक्शन, नागपूर व पोट ठेकेदार मयूर मल्टीटेक, नांदेड हेही जबाबदार आहेत.आतापर्यंत या ठेकेदाराला ७० टक्के रक्कम अदा केली आहे. त्यामुळे त्याला बिल देणारे इंजिनिअर व अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी मिळून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याने त्या सर्वांकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी आगामी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग