शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव, उभादांडा येथील वुड हाऊसचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:02 IST

पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाने उभादांडा सागरेश्वर किनारी उभारलेले वुड हाऊस, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, पदपथ, गॅझिबो यांचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव, उभादांडा येथील वुड हाऊसचे नुकसान शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा वेंगुर्ला भाजपाचा आरोप

वेंगुर्ला : पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाने उभादांडा सागरेश्वर किनारी उभारलेले वुड हाऊस, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, पदपथ, गॅझिबो यांचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यातील स्वच्छतागृह आणि चेंजिंग रुम पूर्णपणे कलंडले असून चुकीच्या पद्धतीने उभारणी केल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तांत्रिक सहाय्यक अधिकारी पृथ्वीराज जाधव यांना सागरेश्वर येथे भेट घेऊन घेराव घालण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाबा नाईक, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, युवामोर्चाचे संदीप पाटील, समीर चिंदरकर, नितीश कुडतरकर, दादा तांडेल, कमलाकांत प्रभू, विद्याधर धानजी, जगन्नाथ राणे, शेखर काणेकर, दशरथ गडेकर, पुंडलिक हळदणकर, निलय नाईक, राहुल मोर्डेकर, प्रकाश मोटे, प्रथमेश यंदे, सोनू सावंत आदी उपस्थित होते.या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या ओरोस येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.सध्या एमटीडीसीने समुद्रकिनारी जेथे वुड हाऊस उभारले आहेत त्या जागी पूर्वी सुरुची झाडे होती. ती झाडे समुद्री उधाणाने उन्मळून पडून ती जागा सपाट झालेली होती. त्यामुळे शेजारीच असलेल्या ग्रामस्थांना समुद्राच्या उधाणाचा त्रास होत होता. ग्रामस्थांची सातत्याने धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होती. परंतु त्यांच्या मागणीस केराची टोपली दाखवून पर्यटन विकास महामंडळाने हा पर्यटन प्रकल्प उभा केला होता.यापूर्वीही पर्यटन महामंडळाने तंबूनिवास प्रकल्प सागरेश्वरच्या सुरुच्या बनात उभारला होता. त्यावेळीसुद्धा हा प्रकल्प खासगी जमिनीत उभारल्यामुळे जागा मालकाने त्याच्यावर ताबा सांगून ते तंबू आपल्या ताब्यात घेतल्यामुळे तो प्रकल्प बंद झाला. त्यावेळीही दोन कोटीेंचा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गुंडाळावा लागला. त्यामुळे शासकीय निधीची लूटमार होत असल्याचा आरोप करण्यात आला.विरोधी पक्षनेत्यांमार्फत अधिवेशनात आवाज उठविणारठेकेदार व अधिकारी यांच्यात साटेलोट असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या जागेचे तांत्रिक सर्वेक्षण करणारी कंपनी स्ट्रकवेल इंजिनिअरिंग, मुंबई हीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. त्या कंपनीने जागेचा सर्व्हे, डिझाईन देण्याचे काम केले आहे. कामाचे ठेकेदार गुप्ता कन्स्ट्रक्शन, नागपूर व पोट ठेकेदार मयूर मल्टीटेक, नांदेड हेही जबाबदार आहेत.आतापर्यंत या ठेकेदाराला ७० टक्के रक्कम अदा केली आहे. त्यामुळे त्याला बिल देणारे इंजिनिअर व अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी मिळून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याने त्या सर्वांकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी आगामी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग