शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:41 IST

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावीनंदकुमार घाटे यांची निवेदनाद्वारे मागणी

देवगड : सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, यावर्षी पावसाळी हंगाम चांगला होता व भातशेतीचे उत्पादनही अपेक्षितपणे चांगले आले होते. भातशेती तयार झाल्यानंतर सतत आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतात पडून त्याचे नुकसान झाले आहे.कोरोना संक्रमणामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यावर्षी ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादनात प्रचंड घट झाल्याने ग्रामीण शेतकरी भातशेतीबरोबर भाजीपाला उत्पादनातही कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे कृषी विभागामार्फत भातशेती नुकसानीची पाहणी व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित मिळण्याकरीता प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे निवेदन देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्यासह शरद शिंंदे, नागेश आचरेकर, उदय रूमडे, बाबू वाळके, कृष्णा परब आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी