शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

ओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:17 IST

forest department sindhudurg -ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे.

ठळक मुद्देओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान ग्रामस्थांचा जीव धोक्यात : कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे. दिवसाही घराबाहेर पडणे जीवावर बेतणार आहे. नुकसानीबरोबर जीवही धोक्यात आला असून वन विभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे ठोस उपाययोजना करीत नाही. आम्हांला कागदोपत्री नुकसानीचे पंचमाने नको. तर गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.मंगळवारी रात्री गव्यांच्या कळपाने ओटवणे कापईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यात चवळी, मका, मिरची, वाल व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे ५० ते ६० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक यांच्या शेतीचीही गव्यांच्या कळपाने मोठी नुकसानी केलेली आहे.गव्यांचे कळप हे रात्रंदिवस भरवस्तीत वावरत असून वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत निद्रिस्त आहे. पंचनामा करण्यापलीकडे वन विभाग ठोस उपाययोजना करीत नाही, असे सांगत शेती बागायती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करावी की गव्यांचे पोट भरण्यासाठी करावी? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.जीव जाण्याची वाट पाहताय काय ?कर्ज काढून शेती बागायती केली अन् गव्यांच्या उपद्रवामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. २००८ साली याच वाडीमधील हत्तीच्या हल्ल्यात केशव उपरकर यांना जीव गमवावा लागला होता. आता गव्याच्या हल्ल्यात कोणाचा जीव जाणार? त्याच्या प्रतीक्षेत वन विभाग आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग