शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

ओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:17 IST

forest department sindhudurg -ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे.

ठळक मुद्देओटवणेत गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान ग्रामस्थांचा जीव धोक्यात : कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : ओटवणे कापईवाडी परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा दिवसरात्र संचार सुरू असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांची दिवसा व रात्री बागायती शेतीत तसेच वस्तीत घुसून दहशत सुरू आहे. दिवसाही घराबाहेर पडणे जीवावर बेतणार आहे. नुकसानीबरोबर जीवही धोक्यात आला असून वन विभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे ठोस उपाययोजना करीत नाही. आम्हांला कागदोपत्री नुकसानीचे पंचमाने नको. तर गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.मंगळवारी रात्री गव्यांच्या कळपाने ओटवणे कापईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यात चवळी, मका, मिरची, वाल व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे ५० ते ६० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक यांच्या शेतीचीही गव्यांच्या कळपाने मोठी नुकसानी केलेली आहे.गव्यांचे कळप हे रात्रंदिवस भरवस्तीत वावरत असून वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत निद्रिस्त आहे. पंचनामा करण्यापलीकडे वन विभाग ठोस उपाययोजना करीत नाही, असे सांगत शेती बागायती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करावी की गव्यांचे पोट भरण्यासाठी करावी? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.जीव जाण्याची वाट पाहताय काय ?कर्ज काढून शेती बागायती केली अन् गव्यांच्या उपद्रवामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. २००८ साली याच वाडीमधील हत्तीच्या हल्ल्यात केशव उपरकर यांना जीव गमवावा लागला होता. आता गव्याच्या हल्ल्यात कोणाचा जीव जाणार? त्याच्या प्रतीक्षेत वन विभाग आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग