शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Cyclone Nisarga: वादळ नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा, नारायण राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:00 IST

निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  

ठळक मुद्देवादळ नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा, नारायण राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला शासनाने वाढीव निधी देणे आवश्यक

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळामुळेसिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत १०५ रुग्ण आढळले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कोरोनाबाधित रुग्णांवर योग्यरित्या उपचार करत नाही. रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला शासनाने वाढीव निधी देणे आवश्यक होते, असे असतानाही हे सरकार जिल्ह्याला दिलेला निधी परत घेत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी  केला आहे.

जिल्ह्यात उद्भवलेले कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि परत जात असलेला निधी या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे त्वरित व्हावा, गाव पातळीवर कोरोना पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकाºयांना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्याची शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करावीच लागेलजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह येतो मग निगेटिव्ह येतो. रुग्णांची होत असलेली हेळसांड आदी बाबींचा आमदार नीतेश राणे यांनी पदार्फाश केला आहे. तसेच याला जबाबदार असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र रुग्णांबाबत बेफिकीर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल . परंतु, कारवाई होत नसल्यास याबाबत आम्ही अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशाराही खासदार राणे यांनी दिला आहे.१४ कोटींमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार !

  • सन २0१९-२0 ची चांदा ते बांदा योजना आणि २0२0-२१ च्या बजेट बाबत चर्चा केली असता चांदा ते बांदा योजनेचे तब्बल ९२ कोटी रुपये शासनाला परत केले आहेत.
  • २0२0-२१ च्या १४४ कोटी बजेटमध्ये कपात करून केवळ ४४ कोटी निधी मंजूर केला आहे.
  •  केवळ १४ कोटी रुपये शासनाने जिल्ह्याला दिले आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र १४ कोटींमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

आवश्यक साधनसामुग्रीची मागणी करणारराणे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करायला कमी पडत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकत्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच याकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करून द्यावी, यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरकार राज्य चालविण्यास अपयशीजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा कालावधीत जिल्ह्याला राज्य शासनाकडून वाढीव निधी देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता राज्य सरकार जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी परत मागे घेत आहे.कमी निधीमध्ये विकास कसा होणार ? असे सांगत हे सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप राणे यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारीNarayan Raneनारायण राणे