शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:28 IST

वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.

ठळक मुद्देनाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत पुस्तकाचे प्रकाशन : वेंगुर्ला येथे ५० व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बॅ. नाथ पै या पुस्तकाचे प्रकाशन बॅ. नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं. १ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी पुस्तकाच्या लेखिका व नाथ पै यांची नात अदिती पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रुची राऊत, नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, बॅ. नाथ पै यांचे चिरंजीव शैलेंद्र पै, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. देवदत्त परुळेकर आदी उपस्थित होते.आपल्या आजी-आजोबा, आत्या यांच्याकडून वेंगुर्ल्यातील नाथ पै यांच्या आठवणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि हे पुस्तक लिहिण्यात आले. या पुस्तकात लिखाण हे पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे यांच्याकडून माहिती घेऊन केले असल्याचे अदिती पै यांनी सांगितले. सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार ॲड. देवदत्त परुळेकर यांनी मानले.स्मारकासाठी देणगी देणारनाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे नाव चिपी विमानतळाला देण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले. तर आमदार केसरकर म्हणाले, सीमा प्रश्नावर भाषण करीत असतानाच त्यांचे निधन झाले. नाथ पै यांच्या ५० व्या स्मृतिदिन वर्षात सीमा प्रश्न सुटल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेंगुर्ला केंद्रशाळा नं. १ मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी १० लाखांची देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग