शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:28 IST

वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.

ठळक मुद्देनाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत पुस्तकाचे प्रकाशन : वेंगुर्ला येथे ५० व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बॅ. नाथ पै या पुस्तकाचे प्रकाशन बॅ. नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं. १ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी पुस्तकाच्या लेखिका व नाथ पै यांची नात अदिती पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रुची राऊत, नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, बॅ. नाथ पै यांचे चिरंजीव शैलेंद्र पै, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. देवदत्त परुळेकर आदी उपस्थित होते.आपल्या आजी-आजोबा, आत्या यांच्याकडून वेंगुर्ल्यातील नाथ पै यांच्या आठवणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि हे पुस्तक लिहिण्यात आले. या पुस्तकात लिखाण हे पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे यांच्याकडून माहिती घेऊन केले असल्याचे अदिती पै यांनी सांगितले. सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार ॲड. देवदत्त परुळेकर यांनी मानले.स्मारकासाठी देणगी देणारनाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे नाव चिपी विमानतळाला देण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले. तर आमदार केसरकर म्हणाले, सीमा प्रश्नावर भाषण करीत असतानाच त्यांचे निधन झाले. नाथ पै यांच्या ५० व्या स्मृतिदिन वर्षात सीमा प्रश्न सुटल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेंगुर्ला केंद्रशाळा नं. १ मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी १० लाखांची देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग