शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

तेरेखोल नदीपात्रात मगरींचा वावर

By admin | Updated: January 9, 2016 23:50 IST

प्राण्यांसह ग्रामस्थांवरही हल्ले : नदीकाठची गावे दहशतीखाली ; वनविभाग कायद्याने हतबल

बांदा : गेल्या काही वर्षात तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून नदीपात्रात या महाकाय मगरी सहज दृष्टिस पडत आहेत. या मगरींकडून पाळीव जनावरे तसेच माणसांवरही हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने तेरेखोल नदीकिनाऱ्यालगतच्या गावांतील लोकांना या मगरींच्या दहशतीच्या छायेखाली रहावे लागत आहे. या मगरींचा सर्वाधिक धोका नदीपात्रातील इन्सुली व वाफोली गावांना असून याठिकाणी महाकाय विशाल मगरींचे वास्तव्य आहे. तेरेखोल नदिपात्रात मगरींचे वाढते प्रस्थ असूनही वनखाते मात्र कायद्याकडे बोट दाखवून या मगरींच्या बंदोबस्ताबाबत असमर्थता दाखवत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना या मगरींना पकडण्याचे तंत्र अवगत नसल्याने या मगरींचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. तेरेखोल नदीपात्रात इन्सुली येथे मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी तब्बल १५ ते २0 फूट लांबीच्या महाकाय मगरी कळपाने किनाऱ्यावर पहुडलेल्या दृष्टिस पडतात. याठिकाणी तब्बल ४0 ते ५0 मगरी कायमस्वरुपी वास्तव्यास असल्याचे स्थानिक सांगतात. या मगरींचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिक या नदीपात्रालगत जाण्यासही धजावत नाहीत. तेरेखोल नदीपात्र हे खोल व विस्तीर्ण असल्याने नदीपात्रात मगरींची पैदास ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जानेवारी ते एप्रिल महिना हा थंडीचा हंगाम मगरींच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळेच या मगरींचा मुक्त वावर नदीपात्रात पहावयास मिळतो. मादी मगर ही एका वेळेला २0 ते २५ पिल्लांना जन्म देते. त्यामुळेच तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनखात्याच्या अंदाजानुसार तेरेखोल नदिपात्रात ५00 च्या वर छोट्या व मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी या १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. या मगरींचा वावर दिवसाढवळ्या नदिकिनाऱ्यालगत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षात बांदा शहरासह नदीकिनाऱ्यालगतच्या गावांत मानवी वस्तीत मगरींची पिल्ले सापडली होती. पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून आल्याने ही पिल्ले मानवी वस्तीत शिरली होती. वन अधिनियम कायद्यानुसार मगरींना मारता किंवा जायबंदी करता येत नसल्याने वनखाते या मगरींचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत आहे. तसेच मगरींना हुसकावून लावणे तसेच इतर ठिकाणी स्थानबध्द करण्याचे तंत्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अवगत नसल्याने वनखाते या मगरींसमोर हतबल ठरत आहे. मगर हा पाण्यात राहणारा प्राणी असल्याने या मगरींना पाण्यात जाऊन पकडणे हे धोकादायक आहे. तेरेखोल नदिपात्रातील काही भाग हा मगरींसाठी संरक्षित करावा अशी मागणी मध्यंतरी होत होती. मात्र नदीपात्र हे विस्तीर्ण व विखुरलेले असल्याने व नदिपात्रात सर्वत्रच मगरींचा वावर असल्याने नदीपात्रातील एका भागात 'मगर पार्क' करणे ही चुकिची संकल्पना ठरु शकते. यासाठी वनखात्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. (प्रतिनिधी) मगरींची दहशत : शेतकऱ्यांवर संकट ४तेरेखोल नदीपात्रात आजघडीस शेकडो मगरी आहेत. गेल्या काही वर्षात शेर्ले, कास, मडुरा, इन्सुली, बांदा परिसरात पाळीव गुरे, कुत्रे यांचा फडशा मगरींनी पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी इन्सुली-कुडवटेंब येथे भली मोठी मगर घरात घुसल्याची घटना घडली होती. मडुुरा येथे मगरीने शेतकऱ्यावरही हल्ला केल्याने शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला होता. मगरींची दहशत वाढल्याने शेतकऱ्यांना नदीतिरालगत शेती करणे देखिल जीवावर बेतणारे ठरत आहे.