शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यात तुलनेने गुन्ह्याचे प्रमाण कमी

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

सर्वेक्षणातून मिळाली माहिती : ७७५ गुन्हे उघड, सर्वाधिक २७४ गुन्हे चोरीचे

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी  राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे, असे एका सर्व्हेवरून प्राप्त झालेल्या अहवालानंतर स्पष्ट होते. असे असले तरी गेल्या १६ महिन्यांत जिल्ह्यात घरफोडी, शाळा, ज्वेलर्स यासारख्या चोऱ्या, खून, विनयभंग, बलात्कार, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण यासारखे एकूण ९७७ गुन्हे घडले असून त्यापैकी ७७५ गुन्हे उघडकीस आणण्यास सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. यात सर्वाधिक २७४ गुन्हे चोरीचे घडले असून उघड मात्र १०९ गुन्हे झाले आहेत.सिंधुदुर्गच्या लोकसंख्येचा विचार केला तर राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लोकसंख्या खूप कमी आहे. सिंधुदुर्गची लोकसंख्या साडेआठ लाख एवढी आहे. त्यामुळे कमी लोकसंख्या असल्याकारणाने व साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख असल्याकारणाने जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण हे तसे कमीच मानावे लागेल. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गातील गुन्ह्यांचे प्रमाण (रेषो) खूप कमी आहे असे राज्याच्या पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये उघड झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. असे असले तरी जिल्ह्यात चोऱ्या, खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग यासारखे २० प्रकाचे गुन्हे घडले असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ज्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत तसे ते उघड करण्यातही पोलिसांना यश आले आहे.महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सिंधुदुर्गात हे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. असे असले तरी चोरी, विनयभंग यासारखे गुन्हे मात्र कमी होण्याचे नावच घेत नाहीत. समाजामध्ये नैतिकतेचा अभाव असल्यामुळे या अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत. विशेषत: या अशा घटनांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ जिल्ह्याची शांतता तसेच सुव्यवस्थेला धोका निर्माण करत आहेत. जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे सिंधुदुर्गातील जनता हैराण झाली आहे. आता तरी या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कणकवली शहरातील काही घरफोड्यांमध्ये रॉनी गँगच्या तीन संशयितांचा हात असल्याचे पोलीस तपासाअंती पुढे आले आहे. गुन्ह्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा सहभाग वाढत असल्याने समाजव्यवस्थेलाही ही बाब धक्कादायक आहे. चोरी, मारामारी, विनयभंग, बलात्कार यासारखे गुन्हे ऐन तारुण्यात हातातून घडल्याने या प्रकारामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ज्या वयात करिअरच्या दृष्टिकोनातून पावले पडायला हवीत त्या वयात ही पावले तुरुंगाच्या वाटेवर पडताना दिसू लागली आहेत. तरुणांतून सामाजिक जबाबदारीचे भानच हरवत चालले आहे. या तरुणाईला योग्य दिशा मिळत नसल्याने ती गुन्हेगारीच्या विळख्यात आणखीनच गुरफटत चालली आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश होतो. त्यावेळी सर्रास गुन्हेगार हे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील असल्याचे तपासणीअंती उघड होत आहे. त्यामुळे या चोऱ्यांचे वाढते प्रमाण रोखणे पोलिसांसाठीच आव्हान ठरत आहे.गुन्ह्याचे नावदाखलउघडखून०९०९खुनाचा प्रयत्न१०१०सदोष मनुष्य वध०१०१बलात्कार२१२१दरोडा०५०५जबरी चोरी१९१४घरफोडी१००२१चोरी१५५७४दंगा४४४३विश्वासघात१०१०ठकबाजी३७३२नाणीनोटा (खोट्या नोटा)०३००घराविषयक आगळीक (दादागिरी)२८२८अपक्रिया२०१४दुखापत१३८१३७सरकारी नोकरांना मारहाण३२३२विनयभंग५५५५आत्महत्येचा प्रयत्न१०१०अपघात९५८७इतर१८२१५९एकूण९७७७७५जानेवारी २०१४ ते एप्रिल १५ अखेर ९९७ गुन्हे१६ महिन्यांत ९९७ गुन्हे घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. यात विविध सर्व गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामानाने ते गुन्हे उघड करण्यासही पोलीस प्रशासनाला चांगले यश आले.मात्र चोरी प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात या विभागाला सपशेल अपयश आल्याचे दिसून येते. जबरी चोरीचे १९ गुन्हे घडले. त्यापैकी १४ उघड झाले. घरफोडीचे १०० गुन्हे घडले. त्यापैकी २१ उघड झाले व चोरीचे १५५ गुन्हे घडले त्यात ७४ गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. असे एकूण चोरीचे २७४ गुन्हे घडले. त्यापैकी नाममात्र १०९ गुन्हे उघडकीस आले आहेत.३२ सरकारी कर्मचाऱ्यांना झाली मारहाणसरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वेळेत एखादे काम पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवत काही राजकारणी व्यक्ती म्हणा किंवा काही सर्वसामान्य व्यक्तींकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते किंवा उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवून शासकीय डॉक्टरांनाही मारहाण केल्याच्या घटना सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या प्रकारचे तब्बल ३२ गुन्हे घडले असून ते सर्वच्या सर्व गुन्हे उघड झाले आहेत. या आकडेवारीवरून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होते.