शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:08 IST

माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.

ठळक मुद्देमाजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक अधिकारी प्रकरण मिटविण्यासाठी घरी येतात, सावंतवाडी पंचायत समिती बैठक

सावंतवाडी : माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे. या गावांनी पाण्यासाठी कुठे जावे? अधिकारी हे प्रकरण बाहेर काढल्यावर मला घरी भेटायला येतात. पण या पुढे अधिकाऱ्यांनी सभागृहातील विषय सभागृहातच घ्यावा. मला घरी भेटण्यासाठी येऊ नये. आलात तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.सावंतवाडी पंचायत समितीची बैठक सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. एन. नाईक, सदस्य संदीप गावडे, शीतल राऊळ, मेघ:श्याम काजरेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, मोहन चव्हाण, मनिषा गोवेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी पंचायत समितीची बैठक विविध विषयांवरून चांगलीच गाजली. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सदस्यांनी आपली वेगवेगळी मते मांडली. यात नळपाणी योजना राबविण्यात आली, पण ती बंद का? अनेक ठिकाणी इंधन विहिरी देण्यात आल्यात, पण त्यामध्ये पाणी नाही. मग हे प्रकल्प फक्त दिखावा की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहेत. या इंधन विहिरी पुन्हा दुरूस्त करण्यात याव्यात. पण तसे प्रयत्न कुणाकडूनही का होत नाहीत? असा सवाल सदस्यांनी केला.तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. अनेक गावात पाणीटंचाई आली की विहिरी कशासाठी मारल्या जातात, असा सवालही सावंत यांनी यावेळी केला.अंगणवाडीला मिळणारे धान्य अद्याप माजगाव येथे का पोहोचले नाही? असा सवालही सावंत यांनी केला. यावेळी सभापती पेडणेकर यांनी इतर गावांना हे धान्य पोहोचले असल्याचे स्पष्ट केले. तसेच माजगाव येथे का पोहोचले नाही याची माहिती द्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.करिवडे येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला काळ््या यादीत टाका, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. तसेच पावसाळा आला तरी ग्रामीण भागात अद्याप रस्त्याचे काम कसे होत नाहीत, असा सवाल गोवेकर यांनी केला आहे.प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारामाजगाव-मळगाव येथील नळपाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. यावरून जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ही योजना बोगस होती म्हणूनच आमचा गाव पाण्यापासून आजपर्यंत वंचित राहिला आहे. याला जबाबदार कोण? या योजनेच्या विजेचे बिल चार लाख आहे. ते बिल कोणी भरायचे? असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळत नाही.

तुम्हाला फोन केला तर माहिती मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत मी जाणार आहे. यात दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर प्रसंगी न्यायालयात जाईन, असा इशाराही यावेळी सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच मी सभागृहात प्रश्न विचारतो. मला घरी भेटण्यासाठी येण्याची हिंमतही करू नका, असेही सावंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग