शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:08 IST

माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.

ठळक मुद्देमाजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक अधिकारी प्रकरण मिटविण्यासाठी घरी येतात, सावंतवाडी पंचायत समिती बैठक

सावंतवाडी : माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे. या गावांनी पाण्यासाठी कुठे जावे? अधिकारी हे प्रकरण बाहेर काढल्यावर मला घरी भेटायला येतात. पण या पुढे अधिकाऱ्यांनी सभागृहातील विषय सभागृहातच घ्यावा. मला घरी भेटण्यासाठी येऊ नये. आलात तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.सावंतवाडी पंचायत समितीची बैठक सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. एन. नाईक, सदस्य संदीप गावडे, शीतल राऊळ, मेघ:श्याम काजरेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, मोहन चव्हाण, मनिषा गोवेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी पंचायत समितीची बैठक विविध विषयांवरून चांगलीच गाजली. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सदस्यांनी आपली वेगवेगळी मते मांडली. यात नळपाणी योजना राबविण्यात आली, पण ती बंद का? अनेक ठिकाणी इंधन विहिरी देण्यात आल्यात, पण त्यामध्ये पाणी नाही. मग हे प्रकल्प फक्त दिखावा की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहेत. या इंधन विहिरी पुन्हा दुरूस्त करण्यात याव्यात. पण तसे प्रयत्न कुणाकडूनही का होत नाहीत? असा सवाल सदस्यांनी केला.तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. अनेक गावात पाणीटंचाई आली की विहिरी कशासाठी मारल्या जातात, असा सवालही सावंत यांनी यावेळी केला.अंगणवाडीला मिळणारे धान्य अद्याप माजगाव येथे का पोहोचले नाही? असा सवालही सावंत यांनी केला. यावेळी सभापती पेडणेकर यांनी इतर गावांना हे धान्य पोहोचले असल्याचे स्पष्ट केले. तसेच माजगाव येथे का पोहोचले नाही याची माहिती द्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.करिवडे येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला काळ््या यादीत टाका, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. तसेच पावसाळा आला तरी ग्रामीण भागात अद्याप रस्त्याचे काम कसे होत नाहीत, असा सवाल गोवेकर यांनी केला आहे.प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारामाजगाव-मळगाव येथील नळपाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. यावरून जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ही योजना बोगस होती म्हणूनच आमचा गाव पाण्यापासून आजपर्यंत वंचित राहिला आहे. याला जबाबदार कोण? या योजनेच्या विजेचे बिल चार लाख आहे. ते बिल कोणी भरायचे? असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळत नाही.

तुम्हाला फोन केला तर माहिती मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत मी जाणार आहे. यात दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर प्रसंगी न्यायालयात जाईन, असा इशाराही यावेळी सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच मी सभागृहात प्रश्न विचारतो. मला घरी भेटण्यासाठी येण्याची हिंमतही करू नका, असेही सावंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग