शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

By admin | Updated: July 27, 2014 21:49 IST

प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती

सुरेश पवार - दस्तुरी , प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती. एखादा संदेश पोचवण्यासाठी माणूस चालत अथवा घोड्यावरून जायचा. काहीवेळा निरोप उशिराने मिळत. मात्र, अन्य पर्याय नसल्याने माणसाचा नाईलाज व्हायचा. कालांतराने अनेक बदल झाले.विज्ञान, तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली. छपाई यंत्राचा शोध लागला, पोस्टाची निर्मिती झाली व माणसाला संपर्काचे प्रभावी साधन मिळाले. पत्रव्यवहार सुरु झाले. माणसाच्या भावभावनांना व्यक्त करण्याचे साधन मिळाले. तत्काळ निरोपासाठी ‘तार’ निघाली. मात्र, विज्ञानात बदल झाले आणि दूरध्वनीचा (फोन) शोध लागला. पण, सर्वसामान्यांना फोन परवडणारा नसल्याने पत्रव्यवहार सोयीचा वाटे. परंतु पुढील काळात क्रांती घडवणारा मोबाईल आला आणि माणसाचे अवघे जीवन बदलून गेले.मोबाईल प्रत्येकाची गरज बनला. पत्र, तार, फॅक्स या सर्वांना मोबाईलने केव्हाच मागे टाकले. पत्रव्यवहार तर इतिहासजमा झाला. आता मेसेज, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अपमुळे माणसाला अवघे जग मुठीत आल्यासारखे झाले. काही सेकंदात माहितीचे आदान - प्रदान होऊ लागले. तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी माणसाच्या भावना बदलू शकत नाहीत. कित्येक महिन्यानी येणाऱ्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारा माणूस मेसेजेसची कधीच वाट पाहात नाही. पत्रातील भावनिक नाते अजिबात दिसत नाही.