शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

CoronaVirus : रुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:38 IST

कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.

ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरणघराबाहेर न पडण्याच्या सूचना, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.साळगाव गावामध्ये मुंबईवरून आलेली विवाहिाा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हे कुटुंबीय १५ मे रोजी मुंबईवरून साळगावात आले होते. मिनीबसच्या माध्यमातून आलेले हे कुटुंबीय हे १५ मेपासून साळगाव प्राथमिक शाळा नंबर ४ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन होते.दरम्यान, या कुटुंबीयांसोबत कणकवली येथील आलेली व्यक्ती २ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर या सर्व कुटुंबीयांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे अहवाल आले नव्हते. दरम्यान, त्यांचे १४ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन झाल्यावर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, होम क्वारंटाईन न राहता वाडीतील अनेकांच्या संपर्कात हे कुटुंबीय आले. त्यांचे स्वॅब चाचणी अहवाल ५ जून रोजी प्राप्त झाले. यात एक विवाहिता पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मात्र, ती विवाहिता व त्यांचे कुटुंबीय गेल्या आठ दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आले होते. ते अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे गावामध्ये घबराट निर्माण झाली आहे.याबाबत माहिती मिळताच साळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश धुरी यांनी आपल्या ग्राम कमिटी, ग्रामपंचायत सदस्यांसह या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. मात्र, या घटनेकडे शासनाने दुर्लक्ष केला असल्याचे दिसून येत आहे.प्रशासन ढिम्म, गावांना फटकायाबाबत सरपंच उमेश धुरी यांनी सांगितले की प्रशासन जे १४ दिवसांचे क्वारंटाईन करीत आहे ते चुकीचे आहे. २२ दिवसाचे क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. प्रशासन ढिम्म झाले आहे. या कुटुंबासोबत असलेली कणकवलीची व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर यांचे घेतलेले स्वॅब आणि त्यांचे प्राप्त झालेले अहवाल याचा कालावधी हा मोठा आहे. या कालावधीत हे कुटुंबीय अनेकांच्या संपर्कात आले आहे.

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका गावांना बसत आहे. या गावातील ग्रामस्थांनी काय चूक केली होती? असा सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या या कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग