शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : रुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:38 IST

कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.

ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरणघराबाहेर न पडण्याच्या सूचना, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.साळगाव गावामध्ये मुंबईवरून आलेली विवाहिाा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हे कुटुंबीय १५ मे रोजी मुंबईवरून साळगावात आले होते. मिनीबसच्या माध्यमातून आलेले हे कुटुंबीय हे १५ मेपासून साळगाव प्राथमिक शाळा नंबर ४ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन होते.दरम्यान, या कुटुंबीयांसोबत कणकवली येथील आलेली व्यक्ती २ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर या सर्व कुटुंबीयांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे अहवाल आले नव्हते. दरम्यान, त्यांचे १४ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन झाल्यावर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, होम क्वारंटाईन न राहता वाडीतील अनेकांच्या संपर्कात हे कुटुंबीय आले. त्यांचे स्वॅब चाचणी अहवाल ५ जून रोजी प्राप्त झाले. यात एक विवाहिता पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मात्र, ती विवाहिता व त्यांचे कुटुंबीय गेल्या आठ दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आले होते. ते अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे गावामध्ये घबराट निर्माण झाली आहे.याबाबत माहिती मिळताच साळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश धुरी यांनी आपल्या ग्राम कमिटी, ग्रामपंचायत सदस्यांसह या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. मात्र, या घटनेकडे शासनाने दुर्लक्ष केला असल्याचे दिसून येत आहे.प्रशासन ढिम्म, गावांना फटकायाबाबत सरपंच उमेश धुरी यांनी सांगितले की प्रशासन जे १४ दिवसांचे क्वारंटाईन करीत आहे ते चुकीचे आहे. २२ दिवसाचे क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. प्रशासन ढिम्म झाले आहे. या कुटुंबासोबत असलेली कणकवलीची व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर यांचे घेतलेले स्वॅब आणि त्यांचे प्राप्त झालेले अहवाल याचा कालावधी हा मोठा आहे. या कालावधीत हे कुटुंबीय अनेकांच्या संपर्कात आले आहे.

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका गावांना बसत आहे. या गावातील ग्रामस्थांनी काय चूक केली होती? असा सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या या कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग