शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

CoronaVirus : रुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:38 IST

कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.

ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कात अनेक व्यक्ती?; साळगावमध्ये भीतीचे वातावरणघराबाहेर न पडण्याच्या सूचना, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.साळगाव गावामध्ये मुंबईवरून आलेली विवाहिाा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हे कुटुंबीय १५ मे रोजी मुंबईवरून साळगावात आले होते. मिनीबसच्या माध्यमातून आलेले हे कुटुंबीय हे १५ मेपासून साळगाव प्राथमिक शाळा नंबर ४ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन होते.दरम्यान, या कुटुंबीयांसोबत कणकवली येथील आलेली व्यक्ती २ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर या सर्व कुटुंबीयांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे अहवाल आले नव्हते. दरम्यान, त्यांचे १४ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन झाल्यावर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, होम क्वारंटाईन न राहता वाडीतील अनेकांच्या संपर्कात हे कुटुंबीय आले. त्यांचे स्वॅब चाचणी अहवाल ५ जून रोजी प्राप्त झाले. यात एक विवाहिता पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मात्र, ती विवाहिता व त्यांचे कुटुंबीय गेल्या आठ दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आले होते. ते अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे गावामध्ये घबराट निर्माण झाली आहे.याबाबत माहिती मिळताच साळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश धुरी यांनी आपल्या ग्राम कमिटी, ग्रामपंचायत सदस्यांसह या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. मात्र, या घटनेकडे शासनाने दुर्लक्ष केला असल्याचे दिसून येत आहे.प्रशासन ढिम्म, गावांना फटकायाबाबत सरपंच उमेश धुरी यांनी सांगितले की प्रशासन जे १४ दिवसांचे क्वारंटाईन करीत आहे ते चुकीचे आहे. २२ दिवसाचे क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. प्रशासन ढिम्म झाले आहे. या कुटुंबासोबत असलेली कणकवलीची व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर यांचे घेतलेले स्वॅब आणि त्यांचे प्राप्त झालेले अहवाल याचा कालावधी हा मोठा आहे. या कालावधीत हे कुटुंबीय अनेकांच्या संपर्कात आले आहे.

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका गावांना बसत आहे. या गावातील ग्रामस्थांनी काय चूक केली होती? असा सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या या कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग