शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 3:45 PM

गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.

ठळक मुद्दे गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तळेरे : गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे गेले तीन महिने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने समाजाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच गेले तीन महिने फिरता व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या स्तरावरून समाजासाठी ठोस धोरण आखून पुन्हा व्यवसाय होण्यासाठी योग्य ती मदत करावी, अशी मागणी कणकवली तालुका गोंधळी समाजाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी सिंधुदुर्गजिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करून समाजाच्यावतीने लेखी निवेदनही सादर केले आहे.जगण्याचा पर्याय म्हणून समाजातील काही लोक गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यावशक वस्तू म्हणजेच भाजीपाला विकून आपले कुटुंब चालवीत होते. परंतु ह्या कोरोना या रोगामुळे खेड्यापाड्यांपासून गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांकडून फिरून भाजी विक्री करण्यास विरोध होत असल्याने समाजावर उपासमारीचे दिवस आले आहे.

आमच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेमधील असणारे व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी व उदारनिर्वाहाचे मार्गदर्शन करावे जेणेकरून गोंधळी समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. तरी योग्य विचार करून गोंधळी समाजाला न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी स्वीकारले. याप्रसंगी गोंधळी समाज तालुका अध्यक्ष शशिकांत इंगळे, सल्लागार बसवराज सूर्यवंशी, भैरीनाथ कांबळे, राजू इंगळे, माणिकराज वाघमारे हे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी