शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:06 IST

युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देहे सरकार परप्रांतियांचे आहे कावैभव खेडेकर यांचा सवाल

खेड : युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.मुंबईतून कोकणात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटाचे जास्त पैसे घेत असल्याच्या प्रकारावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होईल. या काळात आपण अनेक संघर्षाला तोंड देत इथपर्यंत आलो आहोत. आता यापुढील काळ अधिक जबाबदारीचे आहेत.

मुंबईकर बांधव आता हळूहळू आपल्या गावी येत आहेत. त्यांची योग्यती वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यात खूप अडचणीत दिवस काढले आहेत. दीड महिन्यात कोणताही रोजगार नाही, हातातील पैसे संपले, घरातील धान्य संपल. काहीजण चालत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सरकार रोज नवनवीन नियम काढत आहे. पण त्याचू अंमलबजावणी होत नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परिवहमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल की. लोकांसाठी एस. टी. प्रवास मोफत होईल. तर त्यांच्या सचिवांनी रात्रीच हा निर्णय फिरवला आणि कोकणातील जनतेला प्रति सीटमागे २ हजार रुपये आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

मला सरकारला विचारायच आहे की, हे परप्रांतियांचे सरकार आहे का? युपी, बिहारमधील जनतेसाठी मोफत रेल्वे सेवा दिलीत. खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत जे आपले मतदारही नाहीत. माझा कोकणी माणूस आपल्या पारड्यात भरभरून मत टाकतो. मग त्याला २ हजार रुपयांचा भुर्दंड का, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.त्याचबरोबर इथ आल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागतो. इथ आल्यानंतर तासनतास त्यांना स्वॅबसाठी रांगेत उभ राहावा लागत. काहींना सोडल जात, काहींना तिथेच ठेवल जात. सरकार आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरकारच अधिकारी ऐकत नाहीत हे अधिकारी सुप्रीम पॉवर असल्यासारखे वागत आहेत.

कोरोनाचा सामना करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सरकारचा अजिबात वचक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एस. टी. सेवा पुरवावी. अन्यथा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण