शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:06 IST

युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देहे सरकार परप्रांतियांचे आहे कावैभव खेडेकर यांचा सवाल

खेड : युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.मुंबईतून कोकणात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटाचे जास्त पैसे घेत असल्याच्या प्रकारावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होईल. या काळात आपण अनेक संघर्षाला तोंड देत इथपर्यंत आलो आहोत. आता यापुढील काळ अधिक जबाबदारीचे आहेत.

मुंबईकर बांधव आता हळूहळू आपल्या गावी येत आहेत. त्यांची योग्यती वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यात खूप अडचणीत दिवस काढले आहेत. दीड महिन्यात कोणताही रोजगार नाही, हातातील पैसे संपले, घरातील धान्य संपल. काहीजण चालत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सरकार रोज नवनवीन नियम काढत आहे. पण त्याचू अंमलबजावणी होत नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परिवहमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल की. लोकांसाठी एस. टी. प्रवास मोफत होईल. तर त्यांच्या सचिवांनी रात्रीच हा निर्णय फिरवला आणि कोकणातील जनतेला प्रति सीटमागे २ हजार रुपये आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

मला सरकारला विचारायच आहे की, हे परप्रांतियांचे सरकार आहे का? युपी, बिहारमधील जनतेसाठी मोफत रेल्वे सेवा दिलीत. खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत जे आपले मतदारही नाहीत. माझा कोकणी माणूस आपल्या पारड्यात भरभरून मत टाकतो. मग त्याला २ हजार रुपयांचा भुर्दंड का, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.त्याचबरोबर इथ आल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागतो. इथ आल्यानंतर तासनतास त्यांना स्वॅबसाठी रांगेत उभ राहावा लागत. काहींना सोडल जात, काहींना तिथेच ठेवल जात. सरकार आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरकारच अधिकारी ऐकत नाहीत हे अधिकारी सुप्रीम पॉवर असल्यासारखे वागत आहेत.

कोरोनाचा सामना करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सरकारचा अजिबात वचक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एस. टी. सेवा पुरवावी. अन्यथा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण