शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:06 IST

युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देहे सरकार परप्रांतियांचे आहे कावैभव खेडेकर यांचा सवाल

खेड : युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.मुंबईतून कोकणात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटाचे जास्त पैसे घेत असल्याच्या प्रकारावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होईल. या काळात आपण अनेक संघर्षाला तोंड देत इथपर्यंत आलो आहोत. आता यापुढील काळ अधिक जबाबदारीचे आहेत.

मुंबईकर बांधव आता हळूहळू आपल्या गावी येत आहेत. त्यांची योग्यती वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यात खूप अडचणीत दिवस काढले आहेत. दीड महिन्यात कोणताही रोजगार नाही, हातातील पैसे संपले, घरातील धान्य संपल. काहीजण चालत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सरकार रोज नवनवीन नियम काढत आहे. पण त्याचू अंमलबजावणी होत नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परिवहमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल की. लोकांसाठी एस. टी. प्रवास मोफत होईल. तर त्यांच्या सचिवांनी रात्रीच हा निर्णय फिरवला आणि कोकणातील जनतेला प्रति सीटमागे २ हजार रुपये आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

मला सरकारला विचारायच आहे की, हे परप्रांतियांचे सरकार आहे का? युपी, बिहारमधील जनतेसाठी मोफत रेल्वे सेवा दिलीत. खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत जे आपले मतदारही नाहीत. माझा कोकणी माणूस आपल्या पारड्यात भरभरून मत टाकतो. मग त्याला २ हजार रुपयांचा भुर्दंड का, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.त्याचबरोबर इथ आल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागतो. इथ आल्यानंतर तासनतास त्यांना स्वॅबसाठी रांगेत उभ राहावा लागत. काहींना सोडल जात, काहींना तिथेच ठेवल जात. सरकार आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरकारच अधिकारी ऐकत नाहीत हे अधिकारी सुप्रीम पॉवर असल्यासारखे वागत आहेत.

कोरोनाचा सामना करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सरकारचा अजिबात वचक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एस. टी. सेवा पुरवावी. अन्यथा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण