शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

CoronaVirus Lockdown : रेड झोनमधल्या चाकरमान्यांचे नखरे, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:16 IST

मालवण शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देरेड झोनमधल्या चाकरमान्यांचे नखरे, प्रशासनाची डोकेदुखी वाढलीहायफाय सुविधा देण्याची होतेय मागणी

मालवण : शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.दरम्यान, महागड्या जेवणासह हायफाय सुविधांची मागणी चाकरमान्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यातच चाकरमान्यांनी समाधान मानावे अशी समज प्रशासनाच्यावतीने संबंधितांना देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगली मेहनत घेतली आहे. तालुक्यातील गावागावातही प्रभावी जनजागृती करीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग तसेच अन्य प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र मेहनत घेण्यात येत आहे.यात आता मुंबईसह, पुण्यातील चाकरमानी गावी परतू लागले आहेत. आतापर्यंत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. यात रेड झोनमधून आलेल्या चाकरमान्यांना संस्थात्मक विलगीकरणात गावागावातील शाळा तसेच अन्य ठिकाणी ठेवण्यात आले आहे.या चाकरमान्यांनी जेवणासह अन्य सुविधांसाठी होणारा खर्च हा स्वत: करायचा आहे.प्रशासनाकडून केवळ पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या गावागावात याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या चाकरमान्यांकडून प्रशासनाकडे चायनीज द्या, वायफायची सुविधा द्या, राहण्यासाठी ज्या शाळा देण्यात आल्या आहेत त्यात झुरळे, उंदीर यांचा त्रास होत आहे. शाळेतच शौचालय, स्वच्छतागृहाची सुविधा द्या यासह अन्य मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत.मुंबई, पुण्यासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावागावात दाखल होत आहेत. यात येथे येण्यासाठी संबंधितांनी जी कारणे दिली आहेत त्याची सत्यता पडताळण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. यात चुकीची कारणे देऊन केवळ मौजमजेसाठी आलेल्या चाकरमान्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.

काही चाकरमानी क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी न राहता इतरत्र फिरत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे अशा चाकरमान्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग