शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

CoronaVirus :उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:00 IST

अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.

ठळक मुद्देउपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्नघरी जाण्याचा केला हट्ट, ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय, बसस्थानकातच वाद

कणकवली : अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.घरी परत जाण्यासाठी या बिहारी कामगारांनी आपले सर्व साहित्य घेऊन कणकवली बसस्थानक गाठले होते. या बसस्थानकातून ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय करण्यात आली होती. तेथून रेल्वेने हे बिहारी मजूर आपल्या गावी जाणार होते. पण कामाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने व नियोजित काम अजून शिल्लक असल्याने त्यांचा व महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेकेदार यांचा बसस्थानकातच वाद झाला.

अखेर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करीत मजुरांची समजूत काढून त्यांना महिनाभर कणकवलीत थांबण्यास सांगितले.ओरोसवरून सोमवारी श्रमिक रेल्वे बिहारला निघणार असल्याने त्या गाडीतून आपल्या गावी जाण्यासाठी अनेक मजूर कणकवली बसस्थानकात दाखल झाले होते. महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांना कणकवली बसस्थानकातून सिंधुदुर्ग रोड रेल्वेस्थानकापर्यंत घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तिथे उपस्थित होते.याचवेळी तिथे दाखल झालेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदाराने या कामगारांना कणकवलीत काही दिवस थांबण्याचे आवाहन केले. यावरून ठेकेदार व मजूर यांच्यात वाद सुरू झाला. याचवेळी काही मजुरांना एसटी बसमधून त्यांनी खाली उतरविले.अखेर तहसीलदार आर. जे. पवार यांनी हस्तक्षेप करून तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्याची ताकीद ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच ठेकेदाराऐवजी थेट कामगारांना मजुरी द्या, असे त्यांना बजावले. तसेच मजुरांना अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करून मग तुम्ही निघून जा, असे सांगितले.

१५ जूनला तुम्हांला घरी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्या मजुरांना दिले. त्यामुळे मजूर काहीसे शांत झाले. मजूर घर गाठण्यासाठी आहेत प्रयत्नशील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर गरीब कामगार, मजूर आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक परप्रांतीय मजूर रेल्वेतून आपल्या राज्यात परतले आहेत.सध्या कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शेकडो परप्रांतातील मजूर तिथे कार्यरत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग