शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

CoronaVirus :उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:00 IST

अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.

ठळक मुद्देउपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्नघरी जाण्याचा केला हट्ट, ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय, बसस्थानकातच वाद

कणकवली : अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.घरी परत जाण्यासाठी या बिहारी कामगारांनी आपले सर्व साहित्य घेऊन कणकवली बसस्थानक गाठले होते. या बसस्थानकातून ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय करण्यात आली होती. तेथून रेल्वेने हे बिहारी मजूर आपल्या गावी जाणार होते. पण कामाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने व नियोजित काम अजून शिल्लक असल्याने त्यांचा व महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेकेदार यांचा बसस्थानकातच वाद झाला.

अखेर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करीत मजुरांची समजूत काढून त्यांना महिनाभर कणकवलीत थांबण्यास सांगितले.ओरोसवरून सोमवारी श्रमिक रेल्वे बिहारला निघणार असल्याने त्या गाडीतून आपल्या गावी जाण्यासाठी अनेक मजूर कणकवली बसस्थानकात दाखल झाले होते. महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांना कणकवली बसस्थानकातून सिंधुदुर्ग रोड रेल्वेस्थानकापर्यंत घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तिथे उपस्थित होते.याचवेळी तिथे दाखल झालेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदाराने या कामगारांना कणकवलीत काही दिवस थांबण्याचे आवाहन केले. यावरून ठेकेदार व मजूर यांच्यात वाद सुरू झाला. याचवेळी काही मजुरांना एसटी बसमधून त्यांनी खाली उतरविले.अखेर तहसीलदार आर. जे. पवार यांनी हस्तक्षेप करून तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्याची ताकीद ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच ठेकेदाराऐवजी थेट कामगारांना मजुरी द्या, असे त्यांना बजावले. तसेच मजुरांना अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करून मग तुम्ही निघून जा, असे सांगितले.

१५ जूनला तुम्हांला घरी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्या मजुरांना दिले. त्यामुळे मजूर काहीसे शांत झाले. मजूर घर गाठण्यासाठी आहेत प्रयत्नशील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर गरीब कामगार, मजूर आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक परप्रांतीय मजूर रेल्वेतून आपल्या राज्यात परतले आहेत.सध्या कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शेकडो परप्रांतातील मजूर तिथे कार्यरत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग