शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

CoronaVirus :आंब्याची स्वत:च विक्री करून नव्या पॅटर्नची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:33 IST

देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.

ठळक मुद्देआंब्याची स्वत:च विक्री करून नव्या पॅटर्नची निर्मितीसंकटावर केली मात, देवगडमधील आंबा बागायतदार बनले आत्मनिर्भर

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये या विषाणूने मार्च महिन्यामध्येच शिरकाव केला. त्यामुळे देशामध्ये २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे ऐन आंबा मौसमातच बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले.

बाजारपेठा बंद, वाहतूक बंद, लोक घरांमध्ये अडकून पडलेले मग आंब्याची विक्री करायची कशी? त्यातच सर्वात मोठी स्थानिक बाजारपेठ असलेले नवीमुंबईतील वाशी मार्केट बंद झाल्याने आंबा बागायतदारांसमोर एक आव्हानच निर्माण झाले. मात्र, विदर्भ मराठवाड्यातील शेतक-यांप्रमाणे कोकणातील शेतकरी कधीही खचून जात नाही. कोकणातील शेतक-यांनी कर्जापोटी किवा नापिक शेत झाल्यामुळे आत्महत्या केल्याची नोंद नाही. त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करून बागायतदारांनी कोरोनावर मात केली.दलाली संपुष्टातदेवगडमधील आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करुन महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांमधील मागणी नुसार घरपोच आंबा पेटीचा पुरवठा केला आहे. यामुळे आंबा विक्रेचे शेतकरी ते थेट ग्राहक असे समीकरण बनले. या समीकरणाने दलाली पूर्णपणे संपुष्टात आली. त्याचा फायदा थेट आंबा बागायतदारांना झाला आहे.

स्वत: पिकविलेला माल स्वत:च विक्री केल्यामुळे आंबा बागायतदारांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कोकणी शेतक-यांच्या पाठीशी व आंबा बागायतदारांच्या पाठीवर हात थोपटणारे राजकीय पाठबळ नसताना सुध्दा कोकणातील शेतकरी व बागायतदार कधीही खचून गेलेला नाही, हे त्याने सिद्ध केले.आंबा पेटीला सर्वाधिक भावयावर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार हे दिसत होते. मात्र, या संकटासमोर येथील बागायतदार हे ध्येयाने उभे राहिले. कोरोना विषाणूच्या काळातही आंब्याच्या पेटीला चांगला भाव मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासात तो सर्वाधिक होता.शेकडो टन आंब्याची मुंबई, पुणेत विक्रीदेवगडसह जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांनी शासनाकडून अत्यावश्यक सेवेतील परवाना मिळवून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पुणे, कोल्हापूर या सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्थांमध्ये आंब्याची विक्री केली आहे. या थेट आंबा विक्रीमुळे त्याचा फायदा स्थानिक बागायतदार, शेतकऱ्यांना झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग