शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

corona virus : रुग्णसंख्या वाढीचा वेग सुसाट, आॅगस्ट महिन्यात तिपटीने रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:42 IST

सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.

ठळक मुद्दे रुग्णसंख्या वाढीचा वेग सुसाट, आॅगस्ट महिन्यात तिपटीने रुग्ण मृतांचा आकडाही चौपट वाढला, भीतिदायक वातावरण

गिरीश परब सिंधुदुर्ग : सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.

त्यातच जिल्हा रुग्णालयातील बहुतांशी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ कोरोनाबाधित सापडल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. खासगी डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत कोरोनाची परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे.जिल्ह्यात रुग्णसंख्या सुसाट वेगाने वाढत आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सेवेचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येत नाहीत. याचाच अर्थ जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली जात आहे.

२६ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कणकवली तालुक्यातील हा रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा झाला. हा रुग्ण मुंबईहून आला होता. रुग्ण सापडताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. कडक लॉकडाऊन जरी करण्यात आले. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. त्यानंतर दुसरा रुग्ण आढळला. तोही मुंबईहून आला होता. तोही रुग्ण बरा झाला.ज्यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होता तेव्हा रुग्णसंख्या कमी प्रमाणात होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त होते. राज्यात हे प्रमाण ८८ टक्के होते. त्यामुळे राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुसरा क्रमांक होता. मात्र, आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले.पहिला रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा होऊन घरी परतला. ११ जून रोजी ५०वा रुग्ण घरी परतला. १७ जून रोजी १०० वा रुग्ण घरी परला. ९ जुलै रोजी हा आकडा २०० वर गेला. ६ आॅगस्ट रोजी ३०० वा रुग्ण घरी परतला. १६ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण घरी परतला. २३ आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण घरी परतला. २८ आॅगस्ट रोजी ६०० वा तर १ सप्टेंबर रोजी ७०० रुग्ण घरी परतला. ३ सप्टेंबर रोजी बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८०० झाली. ७ सप्टेंबर रोजी ९०० वा रुग्ण घरी परतला तर ९ सप्टेंबर रोजी १000वा रुग्ण घरी परतला. आता सक्रिय रुग्णसंख्या १00६ एवढी आहे.असे आढळले रुग्ण, संख्या पोहोचली २०८६जिल्ह्यात २५ वा रुग्ण २९ मे रोजी आढळला. ५० वा रुग्ण ३० मे रोजी आढळला. १०० वा रुग्ण ५ जून रोजी आढळला. २००वा रुग्ण २८ जून रोजी तर २४ जुलै रोजी ३०० वा रुग्ण आढळला. ३ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण आढळला. १० आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण आढळला. १६ आॅगस्ट रोजी ६००वा रुग्ण आढळला.२० आॅगस्ट रोजी ७०० वा रुग्ण, २१ रोजी ८०० वा रुग्ण, २२ रोजी ९०० वा रुग्ण, २५ रोजी १००० वा रुग्ण, २९ रोजी ११०० वा रुग्ण, ३० रोजी १२०० वा रुग्ण आढळला. ४१ सप्टेंबर रोजी १३०० वा, २ रोजी १४०० वा, ४ रोजी १६०० वा, ५ सप्टेंबर रोजी १७०० वा रुग्ण आढळला. ४६ सप्टेंबर रोजी १८०० वा रुग्ण आढळला तर ८ सप्टेंबर रोजी १९०० वा रुग्ण आढळला. ९ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने २००० चा टप्पा पार करून ती २०८६ झाली आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लागणआॅगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीदिवशी तब्बल १३४ रुग्ण आढळून आले. त्यानंतर आतापर्यंत सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे आता वाढत जाणाºया सक्रिय रुग्णसंख्येला सेवा पुरविताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग