शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -कोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:22 IST

कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. ...

ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्दसिंधुदुर्ग विभागाचे ४ लाख ७४ हजार ४०६ रुपयांचे उत्पन्न बुडाले

कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. सिंधुदुर्ग विभागाला विविध आगारातून एस.टी.च्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४ लाख ७४ हजार ४०६ रुपयांच्या उत्पन्नाला सिंधुदुर्ग विभागाला एकाच दिवशी मुकावे लागले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजले जात आहेत. शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी एसटीच्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २० हजार ९६० किलोमीटर एसटी धावलेली नाही. शाळांना सुट्टी दिलेली असल्याने विद्यार्थ्यांअभावी ३९३ शालेय फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तशीच काहीशी स्थिती शनिवारीही होती.

यादिवशीही अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी उपलब्ध नसल्याने अर्ध्यावरून मागे येत असल्याचे एसटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व बाबींमुळे एसटीच्या सरासरी उत्पन्नात घट होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात बंद करण्यात आल्या आहेत. पार्श्वभूमीवर एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.अंमलबजावणीशासनाने कार्यालयांमधील उपस्थिती ३१ मार्चपर्यंत २५ टक्के करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अगदी अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी शासकीय कार्यालयात यावे. अन्यथा काही दिवसानंतर आपले काम करून घ्यावे. असे आवाहन तहसीदारांनी केले आहे. शासकीय कार्यालयांना सुटीच रहाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग