शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

corona in sindhudurg-रेल्वे वाहतुकीस स्थगितीची मागणी : उमेश गाळवणकर : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:25 IST

कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण ...

ठळक मुद्देरेल्वे वाहतुकीस स्थगितीची मागणी : उमेश गाळवणकर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयास सद्यस्थितीत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.या निवेदनात उमेश गाळवणकर यांनी नमूद केले आहे की, सद्यस्थिती पाहता कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच सरकारच्या सर्व स्तरावरून कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून प्रामुख्याने मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे.कोकणातले बरेचसे लोक हे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत. तसेच काही माणसे कोकणातून मुंबई येथे गेलेली आहेत. ती लॉकडाऊनमुळे अडकली आहेत. या सर्वांना कोकणात यायचे आहे हे खरे आहे. परंतु, ती मुंबई ते कोकण प्रवास करताना त्यात जर चुकून कुणी एखादा कोरोना संसर्ग झालेला असेल आणि त्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना झाला तर त्यामुळे निर्माण होणारी स्थिती महाभयंकर असेल.बॅ. नाथ पै यांचे कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांनी पूर्ण केले ते कोकणच्या विकासासाठीच. परंतु हीच कोकण रेल्वे कोकणच्या जनतेला हानी पोहोचविण्यास कारणीभूत ठरणार असेल तर प्रसंगी सर्व जिल्हावासीयांना एकत्र येऊन संपूर्ण रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील रेल्वे ट्रॅकवर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKonkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग