शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

corona in sindhudurg-चाकरमानी आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:56 IST

आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईहून चाकरमान्यांना गावी आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. वाशी मार्केट येथून गावातील मित्राला सिंधुदुर्गात आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांवर गुन्हे दाखल करीत ट्रक व दुचाकीही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देचाकरमानी आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखलदेवगड येथील ट्रक, दुचाकी जप्त : मालवण पोलिसांची कारवाई

मालवण : आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईहून चाकरमान्यांना गावी आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. वाशी मार्केट येथून गावातील मित्राला सिंधुदुर्गात आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांवर गुन्हे दाखल करीत ट्रक व दुचाकीही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.देवगड तालुक्यातील गोवळ येथील दत्ताराम रामचंद्र कोकरे यांच्या मालकीच्या ट्रकवरील चालक दत्ताराम मोहन गावडे (रा. नांदोस) हा देवगड येथून आंब्याचा ट्रक (क्रमांक एम. एच. ०७, एक्स-१०९९) घेऊन मुंबई वाशी मार्केटमध्ये गेला होता. यावेळी गावडे याने आपला मित्र संदेश धोंडी गावडे याला बोलावून घेतले.

हे दोघेही आंब्याच्या ट्रकमधून देवगड-गोवळ येथे ७ एप्रिलला माघारी परतले. गोवळ येथे आल्यावर गावडे याने ट्रकमालक दत्ताराम कोकरे यांना संदेश हा आपला मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही ट्रकमालक कोकरे यांचा चुलतभाऊ प्रदीप गंगाराम कोकरे यांची दुचाकी (क्रमांक एम. एच. ०७, एएफ- ०२९५) घेऊन तालुक्यातील नांदोस गावी आले.ट्रकचालक दत्ताराम गावडे याने मुंबईहून देवगड गोवळ येथे माघारी परतताना तपासणी नाक्यावर खोटी माहिती दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत असताना आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून असे चाकरमानी आणले जात असतील तर ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आंबा, चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ती समज द्यावी, अशा सूचना पोलीस प्रशासनाने केल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस