शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दोडामार्ग येथे हत्तीप्रश्नावरून शेतकरीच आमने-सामने, मोहिमेवरून मतमतांतरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:35 IST

लवकरच वनमंत्री, पालकमंत्र्यांशी बैठक

दोडामार्ग : हत्तीपकड मोहिमेची दिशा ठरविण्याबाबत दोडामार्ग येथे शेतकरी आणि वनविभाग यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांमध्येच हत्तीपकड मोहीम राबवावी की उपाययोजना कराव्यात, यावरून मतमतांतरे असल्याचे समोर आले. या मुद्द्यावरून मुख्य वनसंरक्षकांसमोरच स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावरून शेतकरीच आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी हस्तक्षेप करीत आपापसात न भांडता ज्या ग्रामपंचायतींना उपाययोजनांची गरज आहे त्यांनी तसा ठराव द्या, असे सांगून वातावरण शांत केले. तर वनाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शविली तसेच मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी हत्तीपकड मोहिमेसंदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांशी बोलण्यासंदर्भात वनमंत्री, पालकमंत्री आणि शेतकरी यांच्याशी संयुक्त बैठक लावून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे हत्तीपकड मोहिमेचा चेंडू आता वनमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.हत्तीपकड मोहिमेचा आदेश देऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप हत्तीपकड मोहीम हाती घेतली नसल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी आठ दिवसांपूर्वी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हत्तीबाधित क्षेत्रातील सरपंच, शेतकरी व वनाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीस मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक गवस, उद्धवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, हत्तीबाधित क्षेत्रातील गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.

दिरंगाईबाबत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्राहत्तीपकड मोहीम राबविण्यास झालेल्या दिरंगाईबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांनी हत्तीपकड मोहीम राबविणे कर्नाटकवर अवलंबून आहे. शिवाय पकडलेला हत्ती कुठे ठेवावा, याची तजवीज झाल्यावरच निर्णय होऊ शकतो. याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसा प्रस्तावही पाठविल्याचे सांगितले.

बाबूराव धुरींची यशस्वी मध्यस्तीयाचदरम्यान उपाययोजना राबवाव्यात की हत्तीला पकडावे, यावरून शेतकऱ्यांमध्येच एकमत न झाल्याने प्रवीण गवस, दत्ताराम देसाई व मदन राणे आणि राजन मोर्ये यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपाययोजना नको हत्तीपकड मोहीम राबवा, असे गवस यांचे म्हणणे होते. तर मोर्ये व राणे यांनी आमच्या गावात उपाययोजना हव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यावरून शेतकऱ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर बाबूराव धुरी यांनी मध्यस्थी करत ज्यांना उपाययोजना हव्या असतील त्यांनी तसा ठराव द्या, असे सांगितले व त्याला अधिकाऱ्यांनीही संमती दिली.

हत्तीपकडसाठी कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी बोलणी होणारहत्तीपकड मोहिमेबाबत निर्णय घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री नितेश राणे व शेतकऱ्यांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत हत्तीपकड मोहीम राबविण्यासाठी कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी बोलण्यासंदर्भात विनंती केली जाईल, असे शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपचे तालुकाप्रमुख दीपक गवस व उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सांगितले.