शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

ठेकेदाराचा गोळ्या झाडून खून

By admin | Updated: August 30, 2015 23:35 IST

मृतदेह पोमेंडी रेल्वे पुलाखालील गटारात : पैशाच्या व्यवहारातून खूून झाल्याचा संशय

रत्नागिरी : तालुक्यातील कारवांचीवाडी येथे एका तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ७.४५ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अभिजीत शिवाजी पाटणकर (२६, सन्मित्रनगर, रत्नागिरी) असे मृत तरुण ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर एक तर छाती व पोटावर तीन अशा एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. कारवांचीवाडी - पोमेंडी येथील रेल्वे पुलाच्या खालील रस्त्याच्या गटारात त्याचा मृतदेह आढळून आला. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाला असावा, असा संशय आहे. अभिजीतच्या खुनामागील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत तरुणाच्या घरच्यांकडून गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रमाची माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. अभिजीत हा रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे कुटुंबियांसह राहत होता. शनिवारी रात्री तो घरी आला नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो सापडू शकला नाही. त्यामुळे अभिजीतचे कुटुंबीय चिंतेत होते. आज (रविवार) सकाळी कारवांचीवाडी - पोमेंडी येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या गटारात तरुण पडलेला असल्याची माहिती पोलीसपाटीलांनी दिल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थिटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरा अभिजीतची उत्तरीय तपासणी झाली. पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले वडील शिवाजी पाटणकर यांना त्यांच्या ठेकेदारीच्या कामात अभिजीत हा मदत करीत असे. लहान-मोठी कंत्राटेही तो घेत असे. लांजा तालुक्यातील कुरंग येथील धरणाच्या कामातही तो वडिलांना मदत करीत. अभिजीतला शनिवारी रेल्वेस्थानकावर कोणी बोलावून नेले होते काय? तेथून त्याला दुचाकीनेच पोमेंडीत नेले गेले की कारने नेले? त्याच्यासोबत कोण होते? कारवांचीवाडी येथील पुलाखालीच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या की, अन्य ठिकाणी आधीच गोळ्या झाडून नंतर त्याचा मृतदेह पोमेंडी पुलाखालील गटारात टाकण्यात आला? की हल्लेखोरांपैकीच कोणीतरी त्याची दुचाकी स्थानकावर ठेवून ते रेल्वेने पसार झाले का? हत्या करणारे हे स्थानिक आहेत की जिल्ह्याबाहेरील आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)तीन महिन्यांपूर्वी धक्काबुक्की ?अभिजीतचे वडील पाटबंधारेमध्ये वरिष्ठ अधिकारीपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अभिजीत कोणाचे पैसे देणे असेल ही शक्यता नाही. मात्र, तीन महिन्यांपूर्वी पोलीस खात्यातीलच एका कर्मचाऱ्यासमोर अभिजीतला धक्काबुक्की झाली होती व त्यावेळी दोन तरुणही उपस्थित होते, असे अभिजीतच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याची वरिष्ठांनी आज झाडाझडती घेतल्याचीही चर्चा आहे. तसेच काही संशयितांची चौकशीही सुरू आहे.पूजेसाठी विड्याची पाने आणायला गेला..अभिजीतच्या घरी रविवारी सकाळी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तयारी करण्यात तो मग्न होता. पूजेसाठी विड्याची पाने आणण्यासाठी तो शनिवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर गेला. मात्र घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात आली. शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. दुचाकी स्थानकावर...अभिजीतची दुचाकी कुवारबाव येथील रत्नागिरी रेल्वेस्थानकाबाहेर आढळून आली. दोन वर्षांपूर्वी ठेकेदार भय्या, स्वप्नील मोरे याची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह चंपक मैदानाजवळ व गाडी रेल्वेस्थानकाजवळ आढळली होती. अभिजीतची हत्या झाल्यानंतरही मृतदेह पोमेंडी येथे, तर दुचाकी रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ सापडली आहे. याचे आश्चर्य आहे.