शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:06 IST

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.

ठळक मुद्देसावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर जिओमुळेच आंबोली घाटाची दुर्दशा; चौकशीची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.सावंतवाडी पंचायत समितीची सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. बी. नाईक, सदस्य रवींद्र मडगावकर, रुपेश राऊळ, मनीषा गोवेकर, सुनंदा राऊळ, महादेव चव्हाण, संदीप गावडे, श्रीकृष्ण सावंत आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सावंतवाडी पंचायत समितीची सभा विविध विषयांवरून चांगलीच गाजली. श्रीकृष्ण सावंत यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गणेशभक्तांनी खड्ड्यांतून बाप्पा आणावे अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल करीत तुमच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत खड्डे भरा. अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात भातपिकाची संख्या मोठी असून तत्काळ कृषी विभागातर्फे पंचनामे करून जेवढे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईची मागणी मडगावकर यांनी केली.यावर कृषी अधिकारी यांनी १४५० हेक्टर भात पिकापैकी ७९८ हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले असून तत्काळ तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे काम चालू आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले.

मुसळधार पावसामुळे असनिये, घारपी, फणसवडे, कोनशी या भागातील काजूबागांना बुरशीसदृश रोगामुळे काजूची पाने पिवळी पडत असून काजू बागा उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब कोकण विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना बोलविण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर काजू कलमांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील रस्ते खचले. ठिकठिकाणी दरडी सुद्धा पडल्या असून किती नुकसान झाले व तालुक्याला पूर परिस्थितीत बांधकाम विभागाकडून किती निधी आला याची माहिती द्या, अशी विनंती पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडे केली.

त्यावेळी अशी कोणतीच माहिती बांधकाम विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तालुक्यात एवढी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा बांधकाम विभागाकडे यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने सदस्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग