शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:06 IST

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.

ठळक मुद्देसावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर जिओमुळेच आंबोली घाटाची दुर्दशा; चौकशीची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.सावंतवाडी पंचायत समितीची सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. बी. नाईक, सदस्य रवींद्र मडगावकर, रुपेश राऊळ, मनीषा गोवेकर, सुनंदा राऊळ, महादेव चव्हाण, संदीप गावडे, श्रीकृष्ण सावंत आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सावंतवाडी पंचायत समितीची सभा विविध विषयांवरून चांगलीच गाजली. श्रीकृष्ण सावंत यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गणेशभक्तांनी खड्ड्यांतून बाप्पा आणावे अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल करीत तुमच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत खड्डे भरा. अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात भातपिकाची संख्या मोठी असून तत्काळ कृषी विभागातर्फे पंचनामे करून जेवढे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईची मागणी मडगावकर यांनी केली.यावर कृषी अधिकारी यांनी १४५० हेक्टर भात पिकापैकी ७९८ हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले असून तत्काळ तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे काम चालू आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले.

मुसळधार पावसामुळे असनिये, घारपी, फणसवडे, कोनशी या भागातील काजूबागांना बुरशीसदृश रोगामुळे काजूची पाने पिवळी पडत असून काजू बागा उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब कोकण विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना बोलविण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर काजू कलमांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील रस्ते खचले. ठिकठिकाणी दरडी सुद्धा पडल्या असून किती नुकसान झाले व तालुक्याला पूर परिस्थितीत बांधकाम विभागाकडून किती निधी आला याची माहिती द्या, अशी विनंती पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडे केली.

त्यावेळी अशी कोणतीच माहिती बांधकाम विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तालुक्यात एवढी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा बांधकाम विभागाकडे यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने सदस्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग