शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:06 IST

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.

ठळक मुद्देसावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर जिओमुळेच आंबोली घाटाची दुर्दशा; चौकशीची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.सावंतवाडी पंचायत समितीची सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. बी. नाईक, सदस्य रवींद्र मडगावकर, रुपेश राऊळ, मनीषा गोवेकर, सुनंदा राऊळ, महादेव चव्हाण, संदीप गावडे, श्रीकृष्ण सावंत आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सावंतवाडी पंचायत समितीची सभा विविध विषयांवरून चांगलीच गाजली. श्रीकृष्ण सावंत यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गणेशभक्तांनी खड्ड्यांतून बाप्पा आणावे अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल करीत तुमच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत खड्डे भरा. अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात भातपिकाची संख्या मोठी असून तत्काळ कृषी विभागातर्फे पंचनामे करून जेवढे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईची मागणी मडगावकर यांनी केली.यावर कृषी अधिकारी यांनी १४५० हेक्टर भात पिकापैकी ७९८ हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले असून तत्काळ तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे काम चालू आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले.

मुसळधार पावसामुळे असनिये, घारपी, फणसवडे, कोनशी या भागातील काजूबागांना बुरशीसदृश रोगामुळे काजूची पाने पिवळी पडत असून काजू बागा उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब कोकण विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना बोलविण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर काजू कलमांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील रस्ते खचले. ठिकठिकाणी दरडी सुद्धा पडल्या असून किती नुकसान झाले व तालुक्याला पूर परिस्थितीत बांधकाम विभागाकडून किती निधी आला याची माहिती द्या, अशी विनंती पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडे केली.

त्यावेळी अशी कोणतीच माहिती बांधकाम विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तालुक्यात एवढी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा बांधकाम विभागाकडे यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने सदस्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग