शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टिंग पीपल कुडाळ तालुक्यात ‘डेड’, बीएसएनएल सेवा कोलमडली, ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:04 IST

कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे. कोलडलेल्या सेवेमुळे कंपनीचे ग्राहकही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

ठळक मुद्देग्राहक वळले खासगी कंपनीकडेइंटरनेट सेवाही डबघाईसनुकसान भरपाई देणार का?

रजनीकांत कदम कुडाळ : कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे. कोलडलेल्या सेवेमुळे कंपनीचे ग्राहकही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

एकीकडे सरकार डिजिटल भारत बनविण्यासाठी घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे भारत सरकारचा अधिकृत उपक्रम असलेल्या बीएसएनएल कंपनीची मोबाईल सेवा कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावातील बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.

ग्राहकांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास कमीत कमी दहा ते वीस वेळा नंबर डायल केल्यानंतर फोन लागतो. नाहीतर बहुतेक वेळा नॉट रिचेबल, बिझी, एक रिंग वाजून कॉल कट होणे असे प्रकार होत आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील बीएसएनलच्या मोबाईल टॉवरची योग्य प्रकारे दुरूस्ती केली जात नसल्याने तसेच अधिकारी वर्गाचे होत असलेले दुर्लक्ष ही बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडण्याची प्रमुख कारणे आहेत. या तालुक्यात नवीन टॉवर उभारा, पण त्या अगोदर जुने टॉवर दुरूस्त करा, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.

इंटरनेट सेवाही डबघाईसतालुक्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवाही डबघाईला आली आहे. कुडाळ शहरात काही प्रामाणात इंटरनेट सेवा चांगली असली, तरी ग्रामीण भागात मात्र पूर्णपणे डबघाईला आली असून, अनेक वेळा इंटरनेट सेवा बंदच असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

नुकसान भरपाई देणार का?बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे ठराविक कालावधीसाठी टॉक टाईम, नेट पॅक घेतलेल्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या होणाºया नुकसानाची बीएसएनएल भरपाई देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार विस्कळीत होणाºया सेवेबाबत विचारणा केली असता बीएसएनएल कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रारही आहे.

ग्राहकांच्या संख्येत घट?बीएसएनएल मोबाईल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असताना खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा मात्र चांगल्या पध्दतीने सुरू असल्याने ग्राहक या कंपन्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल कंपनी विविध योजना जाहीर करते. प्रत्यक्षात मात्र सेवा विस्कळीत असल्यामुळे ग्राहक हैराण झाले असून, तालुक्यात बीएसएनएल ग्राहकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग